शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनो, हुंडा मागणाऱ्यांना नकार द्या

By admin | Updated: April 21, 2017 06:10 IST

कोणतेही प्रश्न हे केवळ कायदा किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने सुटतील ही समजूत चुकीची आहे. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध मुलींनी..

नम्रता फडणीस , पुणेकोणतेही प्रश्न हे केवळ कायदा किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने सुटतील ही समजूत चुकीची आहे. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध मुलींनी स्वत:च आवाज उठवला पाहिजे. लग्नामध्ये हुंडा मागणाऱ्या मुलाला मुलींनीच नाकारले पाहिजे आणि कुटुंबासह समाजानेदेखील त्यांना साथ दिली पाहिजे तरच हुंडाबळीच्या घटनांना आळा बसेल, अशा शब्दांत अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मुलींनाच स्वत:च्या हक्काची जाणीव करून देत हुंडाप्रथेवर टीकास्त्र सोडले.पुण्यात एका कार्यक्रमानिमित्ताने त्या आल्या असता ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीने लग्नाचा खर्च करणे शक्य नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि अवघा महाराष्ट्र या घटनेने सुन्न झाला. आजही काही समाजामध्ये लग्नात हुंडा मागितला जातो, तो देण्याची ऐपत नसल्याने तरुणींना मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. कितीतरी मुली या छळाला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडतात. या पार्श्वभूमीवर बोलताना ‘मुलींनीच हुंड्याच्या प्रथेविरुद्ध एल्गार पुकारला पाहिजे’असे परखड विचार अमृता फडणवीस यांनी मांडले.त्या म्हणाल्या, दुष्काळाने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे, तो नैराश्यामध्ये आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाला लग्नाचा खर्च करणे शक्य नाही. याचा विचार हुंडा मागणाऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी केला पाहिजे. हुंडा मागणाऱ्यांना समाजासमोर आणले पाहिजे. मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे केल्यास हुंडा मागणाऱ्या मुलाला नाकारण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. त्यांच्या मतांचा कुटुंबीयांनीही सन्मान करायला हवा. तरच समाजाच्या मानसिकतेत बदल होईल. केवळ कायद्याने महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि आत्महत्या देखील त्यावरचा उपाय नाही, असेही त्यांनी सुनावले. ज्या गावातील कुटुंबाकडे लग्नासाठी पैसे नाहीत, त्यांनी सहकार्यासाठी ग्रामपंचायतीचा दरवाजा ठोठावला पाहिजे, त्यांच्याकडून नक्कीच आर्थिक मदत मिळू शकते. तसेच समाजानेही अशा कुटुंबाच्या हाकेला साद घातली पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)