शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पाणी नाही म्हणून लग्नासाठी मिळेनात मुली

By admin | Updated: March 1, 2017 00:26 IST

नात्यांची गुंफण होताना देखील पाणी आहे का प्रश्न पहिला विचारला जाऊ लागला आहे

अयाज तांबोळी,डेहणे- पाणी टंचाईने जीवाची काहिली तर होऊ लागलीच आहे पण आता नात्यांची गुंफण होताना देखील पाणी आहे का प्रश्न पहिला विचारला जाऊ लागला आहे. मिळेल त्या घागरीत दिवस काढावा लागत असल्याने आता तरुण पोरांना लग्नासाठी मुली देखील मिळत नसल्याचे रखरखीत वास्तव समोर येत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भाग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याने व्यापला आहे. पावसाळ्यात प्रचंड पडणारा पाऊस व उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही, अशी स्थिती असलेला हा विभाग; तसं नाही म्हणायला चासकमान धरण याच भागात, पण असून नसल्यासारखे. या धरणामुळे या भागात हरितक्रांती घडून येईल, अशा अपेक्षेने ग्रामीण शेतकऱ्यांनी जगण्याचा आधार असलेल्या पिकावरच्या जमिनी दिल्या परंतु, आज त्यांना शेतीला सोडाच, पण पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, अशी शोकांतिका आहे. आव्हाट गाव धरणाच्या कडेला आहे, या गावच्या वाड्यांचा परिसर पूर्ण डोंगराळ आहे. बुरुडवाडी, भागीतवाडी, भगतवाडी, तरपाडेवाडी व अशा अनेक वस्त्या स्वातंत्र्याच्या सत्तरीतही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. यांचा मूक टाहो ऐकणारी मायबाप सरकार व प्रशासकीय यंत्रणा मात्र गेंड्याची कातडी पांघरून सुस्त झाली आहे. आव्हाटची तरपाडेवाडी २०-२२ घरांची, ७० ते ८० माणसे. ही वस्ती दिवाळीपासूनच सकाळी भल्या पहाटे उठून पाण्यासाठी पायपीट करते. ५ ते ६ किमीवरून पाणी आणण्यासाठी कधी डोंगर चढायचा तर कधी दरी उतरून खाली जाऊन पाणी आणायचे. चासकमान धरणाचं पाणी दिसत असूनही या वस्तीला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. >दिवाळीपासून पाणी-पाणी करतेय माझी वस्ती सुना लेकरं काम सोडून रानोमाळ झरं शोधत्यात, मिळल तेवढ्या घागरीत दिवस काढायचा. पोटभरून पाणी प्यायची सवय राहिली नाही, लेकरं रातच्याला उठल्यावर त्यांच्यासाठी पाणी जपून ठेवावं लागतं. तरुण पोरांना या पाणीटंचाईमुळे पोरी मिळंणात, आमची हयात गेली आता तरी गावानं आमचं गाऱ्हाणं ऐकावं.- भागुजी मारुती तरपाडे, ज्येष्ठ नागरिक तरपाडेवस्ती