शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

मुलीच ठरल्या बेस्ट!

By admin | Updated: June 18, 2014 04:20 IST

बारावीपाठोपाठ यंदा दहावीच्या परीक्षेचाही विक्रमी निकाल लागला असून, मुलींनी या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे़

पुणे : बारावीपाठोपाठ यंदा दहावीच्या परीक्षेचाही विक्रमी निकाल लागला असून, मुलींनी या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे़ अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंबे ही ४९६ (९९.२० टक्के) गुण मिळवत राज्यात पहिली आल्याचे समजते़ राज्यातील नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ८८़३२ टक्के इतका लागला आहे. ‘सर्वोत्तम पाच’ (बेस्ट आॅफ फाइव्ह) या निकषानुसार निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षी दहावीचा निकाल ८३़४८ टक्के इतका लागला होता. त्यामुळे या वर्षीच्या निकालात ४़८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल क्रमांकावर असून, कोल्हापूर दुसऱ्या, पुणे तिसऱ्या तर लातूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी १ वाजेपासून आॅनलाइन निकाल पाहण्यास दिला आहे. २६ जून रोजी संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत. म्हमाणे म्हणाले, राज्यभरातून १५ लाख ४९ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ६८ हजार ७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ८८़३२ टक्के असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी २१़३२ टक्के आहे. निकालात वर्चस्व राखणाऱ्या मुलींनी यंदाही निकालात आघाडी कायम ठेवली आहे़ दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या नियमित मुलांची संख्या ७ लाख ३२ हजार २१८ (८६़४७ टक्के) असून, मुलींची संख्या ६ लाख ३६ हजार ५७८ (९०़५५ टक्के) आहे. मागील वर्षी मुलांच्या व मुलींच्या निकालामध्ये सुमारे दोन टक्क्यांचा फरक होता. यंदा हा फरक चार टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (प्रतिनिधी)