शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

औरंगाबाद विभागातही मुलीच अव्वल

By admin | Updated: May 30, 2017 18:02 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 30 -  माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला. यंदाही निकालात मुलांना मागे टाकत मुलींनीच बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८९.८३ टक्के असून यामध्ये मुलींचा निकाल ९२.७५ टक्के, तर मुलांचा निकाल ८८.११ टक्के लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६४ टक्क्यांनी अधिक आहे. 
विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे यांनी दुपारी हा निकाल जाहीर केला. यावेळी विभागीय सचिव वंदना वाहुळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते. घनमोडे यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागात नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८९.८३  इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी निकालात मुलींची आघाडी कायम आहे. विभागीय शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना येत्या ९ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे काही दिवस पेपर तपासणीचे संथगतीने झाले. त्यानंतर मात्र, तपासणीचे काम सुरळीत झाले. त्यामुळे निकालाला थोडा वेळ लागल्याचे मंडळाचे अध्यक्ष घनमोडे यांनी सांगितले. यावर्षी बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून घेतली जाणार आहे. 
फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागात १ लाख ६२ हजार ६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये नियमित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५७ हजार ४४६, तर पुनर्परीक्षार्थी ४ हजार ६२० होते. यापैकी १ लाख ४३ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ४१ हजार ४३२ नियमित परीक्षार्थी, तर २ हजार १९ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत ६८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७४ टक्के आहे. वाणिज्य शाखेत १२ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.५७ टक्के एवढे आहे. कला शाखेत ५६ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.६१ एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. व्होकेशनलचे ४ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 
विभागात परभणीची आघाडी
औरंगाबाद विभागात बारावीच्या निकालामध्ये परभणी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८९.७६ टक्के असून ५३ हजार ५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्यात ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.४९ इतकी आहे. परभणी जिल्ह्यात १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९०.५९ टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यात २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.४९ टक्के एवढे निकालाचे प्रमाण आहे. हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८९.८३ टक्के एवढा असून या जिल्ह्यात ११ हजार १९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.