शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

औरंगाबाद विभागातही मुलीच अव्वल

By admin | Updated: May 30, 2017 18:02 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 30 -  माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला. यंदाही निकालात मुलांना मागे टाकत मुलींनीच बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८९.८३ टक्के असून यामध्ये मुलींचा निकाल ९२.७५ टक्के, तर मुलांचा निकाल ८८.११ टक्के लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६४ टक्क्यांनी अधिक आहे. 
विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे यांनी दुपारी हा निकाल जाहीर केला. यावेळी विभागीय सचिव वंदना वाहुळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते. घनमोडे यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागात नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८९.८३  इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी निकालात मुलींची आघाडी कायम आहे. विभागीय शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना येत्या ९ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे काही दिवस पेपर तपासणीचे संथगतीने झाले. त्यानंतर मात्र, तपासणीचे काम सुरळीत झाले. त्यामुळे निकालाला थोडा वेळ लागल्याचे मंडळाचे अध्यक्ष घनमोडे यांनी सांगितले. यावर्षी बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून घेतली जाणार आहे. 
फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागात १ लाख ६२ हजार ६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये नियमित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५७ हजार ४४६, तर पुनर्परीक्षार्थी ४ हजार ६२० होते. यापैकी १ लाख ४३ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ४१ हजार ४३२ नियमित परीक्षार्थी, तर २ हजार १९ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत ६८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७४ टक्के आहे. वाणिज्य शाखेत १२ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.५७ टक्के एवढे आहे. कला शाखेत ५६ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.६१ एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. व्होकेशनलचे ४ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 
विभागात परभणीची आघाडी
औरंगाबाद विभागात बारावीच्या निकालामध्ये परभणी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८९.७६ टक्के असून ५३ हजार ५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्यात ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.४९ इतकी आहे. परभणी जिल्ह्यात १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९०.५९ टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यात २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.४९ टक्के एवढे निकालाचे प्रमाण आहे. हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८९.८३ टक्के एवढा असून या जिल्ह्यात ११ हजार १९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.