शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

बारावी टॉपर्समध्ये आवाज मुलींचाच

By admin | Updated: June 4, 2016 00:45 IST

बारावी उत्तीर्णांमध्ये मुलांना मागे टाकणाऱ्या मुली पुरस्कारांसह बहुतेक महाविद्यालयांमध्येही टॉपर्स ठरल्या आहेत. राज्य मंडळाच्या पुणे विभागाच्या एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार मुलींना मिळाले

पुणे : बारावी उत्तीर्णांमध्ये मुलांना मागे टाकणाऱ्या मुली पुरस्कारांसह बहुतेक महाविद्यालयांमध्येही टॉपर्स ठरल्या आहेत. राज्य मंडळाच्या पुणे विभागाच्या एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार मुलींना मिळाले आहेत. तर फर्ग्युसन, स.प., गरवारे यांसह विविध महाविद्यालयांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे.मागील काही वर्षांपासून बारावीच्या निकालावर मुलींचेच वर्चस्व राहिले आहे. ही परंपरा यंदाही कायम राहिली आहे. आॅनलाईन निकालानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांना संबंंधित महाविद्यालयांमध्ये मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दुपारी तीन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. निकालाच्या आनंदाने महाविद्यालयांचा परिसर फुलून गेला होता. महाविद्यालयांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे रंगले होते. यामध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय दिसून आले. फर्ग्युसन, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य, स. प., गरवारे महाविद्यालयासह बहुतेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. क्वचित एखाद्या शाखेत मुलांचा क्रमांक असल्याचे दिसले. त्यामुळे कौतुक सोहळ््यांवर मुलींचा दबदबा राहिला.राज्य मंडळाच्या पुणे विभागाने विविध विषयांसाठी जाहीर केलेल्या पुरस्कारांवर मुलींनीच बाजी मारली आहे. एकूण २३ पुरस्कारांपैकी १९ पुरस्कार पुण्यासह सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील मुलींनी मिळविले आहेत. त्यामुळे बहुतेक महाविद्यालयांमध्ये शुक्रवारी मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य अधिक फुलले होते. (प्रतिनिधी)वयाच्या ४६व्या वर्षी बारावी उत्तीर्ण‘माणूस शरीराने वृद्ध होतो, मनाने नाही. वय झाले म्हणून शिक्षण बंद करणे चुकीचे आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही तर मुलांवर व नातवंडांवर संस्कार करण्यासाठी होऊ शकतो’, असा विचार करून कसबा पेठेतील उषा खुडे यांनी वयाच्या ४६व्या वर्षी बारावीची परीक्षा देवून ५५ टक्के गुण मिळवले.स. प. महाविद्यालयातून १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देऊन यश मिळवणाऱ्या उषा खुडे यांचा विद्यार्थ्यांसमवेत सत्कार करण्यात आला. खुडे या अंगणवाडी सेविका आहेत. लहान मुलांना शिक्षण देऊन घर सांभाळून त्यांनी बारावीची परीक्षा दिली. मुलगी इंजिनिअर झाली. मुलगा बीएस्सी करत आहे. एका मुलीने बी.कॉम. अभ्यासक्रम पूर्ण केला. आपली मुले घरात इंग्रजी भाषेत संभाषण करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून खुडे यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निश्चय केला आहे. महाविद्यालयातील सत्काराला उत्तर देताना खुडे म्हणाल्या, ‘बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेवून बी.ए.पदवी मिळविणार आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्यासाठी नाही तर मुलांवर व नातवंडांवर संस्कार करण्यासाठी सुद्धा होतो. त्यामुळे वय झाल्याने शिक्षण सोडलेल्या महिलांना पुन्हा शिक्षण घ्यायला सुरूवात केली पाहिजे.