शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

मुलींचीच सरशी!

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला

पुणे : राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या निकालातही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ३.४३ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९० टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. विभागीय मंडळात कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.५६ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८१.५४ टक्के आहे. ३ हजार ९७४ शाळांचा निकाल १०० टक्के तर ६१ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत १ ते २९ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली. १६ लाख ७ हजार ४११ विद्यार्थ्यांपैकी १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च २०१६च्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे निकालात १.९० टक्क्यांनी घट झाली, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)>९१ विद्यार्थी काठावर पासउत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी राज्यभरातील ९१ विद्यार्थी काठावर पास झाले असून, त्यांना सर्व विषयांमध्ये १००पैकी प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. >सिंधुदुर्ग अव्वल तर नांदेड सर्वांत खालीमागील वर्षी दहावी-बारावीच्या निकालाचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. मात्र, यंदा निकालात घट झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वांत जास्त ९७.४७ टक्के लागला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ७४.४८ टक्के आहे. विद्यार्थिनींचा एकूण निकाल ९१.४१ टक्के असून, विद्यार्थ्यांचा निकाल ८७.९८ टक्के लागला आहे. राज्यातील अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८८.७३ टक्के लागला आहे. मंडळातर्फे ५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली; त्यात १० विषयांचा निकाल १०० टक्के आहे.राज्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ४ हजार ७९४ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत तर ५ लाख ६१ हजार ७८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ हजार ५१८ आहे. परीक्षेतील गैरप्रकारासह विविध कारणांमुळे राज्यातील ४२७ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घटदहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे. गेल्या वर्षी ९२.९० टक्के निकालावर झेपावलेल्या मुंबई विभागाला यंदा ९१.९० टक्के निकालावर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील चौथे स्थान मुंबईने कायम राखले आहे. ९१.९० टक्के निकालात मुलींचे प्रमाण ९३.०७ टक्के असून, मुलांचे प्रमाण ९०.८३ टक्के एवढे आहे.