शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचीच सरशी!

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला

पुणे : राज्याचा दहावीचा आॅनलाइन निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) पद्धतीने जाहीर झाला असून, यंदा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या निकालातही मुलींनी आघाडी कायम राखली. मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी ३.४३ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९० टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. विभागीय मंडळात कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.५६ टक्के, तर लातूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ८१.५४ टक्के आहे. ३ हजार ९७४ शाळांचा निकाल १०० टक्के तर ६१ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत १ ते २९ मार्च या कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात आली. १६ लाख ७ हजार ४११ विद्यार्थ्यांपैकी १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च २०१६च्या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा येत्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीप्रमाणेच यंदा दहावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे निकालात १.९० टक्क्यांनी घट झाली, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)>९१ विद्यार्थी काठावर पासउत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी राज्यभरातील ९१ विद्यार्थी काठावर पास झाले असून, त्यांना सर्व विषयांमध्ये १००पैकी प्रत्येकी ३५ गुण मिळाले आहेत. >सिंधुदुर्ग अव्वल तर नांदेड सर्वांत खालीमागील वर्षी दहावी-बारावीच्या निकालाचे सर्व विक्रम मोडीत निघाले होते. मात्र, यंदा निकालात घट झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वांत जास्त ९७.४७ टक्के लागला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ७४.४८ टक्के आहे. विद्यार्थिनींचा एकूण निकाल ९१.४१ टक्के असून, विद्यार्थ्यांचा निकाल ८७.९८ टक्के लागला आहे. राज्यातील अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८८.७३ टक्के लागला आहे. मंडळातर्फे ५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली; त्यात १० विषयांचा निकाल १०० टक्के आहे.राज्यातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ४ हजार ७९४ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत तर ५ लाख ६१ हजार ७८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ हजार ५१८ आहे. परीक्षेतील गैरप्रकारासह विविध कारणांमुळे राज्यातील ४२७ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घटदहावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे. गेल्या वर्षी ९२.९० टक्के निकालावर झेपावलेल्या मुंबई विभागाला यंदा ९१.९० टक्के निकालावर समाधान मानावे लागले. मात्र राज्यातील नऊ विभागीय मंडळांतील चौथे स्थान मुंबईने कायम राखले आहे. ९१.९० टक्के निकालात मुलींचे प्रमाण ९३.०७ टक्के असून, मुलांचे प्रमाण ९०.८३ टक्के एवढे आहे.