शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कळंबोलीत नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: July 22, 2016 01:46 IST

अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप सुटला नसून चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे

कळंबोली : अकरावी प्रवेशाचा घोळ अद्याप सुटला नसून चांगले गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. कळंबोलीत गुरुवारी सायंकाळी सुधागड कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका विद्यार्थिनीने बहिणीच्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ८२ टक्के गुण प्राप्त करूनही चारही लिस्टमध्ये नंबर न लागल्याने तिने स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.पुष्पा धनाजी सूर्यवंशी (१६) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची आटपाडी येथे राहणारी असून सध्या मावस बहिणीकडे शिक्षण घेत होती. दहावीला ८२ टक्के गुण मिळविल्यानंतर तिने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा याकरिता आॅनलाइन अर्ज भरला होता. तिने दहावीची परीक्षाही याच सुधागड शाळेतून दिली होती. त्यामुळे याच ठिकाणी तिला अकरावीकरिता प्रवेश हवा होता. परंतु कटआॅफ लिस्ट ८६ टक्क्याला बंद झाली. त्यामुळे पुष्पाला नैराश्य आले. मॅनेजमेंट कोट्यातून आॅफलाइन प्रवेशाकरिता तिचे पालक भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते अशोक मोटे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते. त्यांनी या संदर्भात प्राचार्य इक्बाल इनामदार यांची भेट घेवून प्रवेशाकरिता विनंती केली होती. इनामदार यांनी सुध्दा कोणतेही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, त्यातल्या त्यात सुधागडमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याकरिता काऊन्सिलिंग राऊंडमध्ये प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता शुक्र वारपर्यंत थांबण्यास पुष्पाच्या पालकांना सांगितले होते. करिअरबाबत अतिशय गंभीर असलेल्या पुष्पाने गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कळंबोली सेक्टर-४ मधील शिवदर्शन इमारतीतील घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास आम्ही सुरू केला आहे. शुक्र वारी शाळेत जावून याबाबत माहिती घेवून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)