शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीने घडविले शिंगणापुरात परिवर्तन

By admin | Updated: April 8, 2016 19:45 IST

चारशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आज शिंगणापुरात खंडित होऊन महिलांना शनिचा चौथरा चढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे

लोकमत एक्सक्ल्युझिव्ह

अहमदनगर: चारशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आज शिंगणापुरात खंडित होऊन महिलांना शनिचा चौथरा चढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. २८ नोव्हेंबर रोजी चौथऱ्यावर प्रवेश केलेल्या अज्ञात तरुणीने खऱ्या अर्थाने हा लढा पेटविला. तिच्या त्या बंडामुळेच स्त्री जगतासाठी आता हा चौथरा खुला झाला आहे. सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत काही सेकंदात ही तरुणी चौथऱ्यावर गेली होती. त्यानंतर ती तातडीने निघून गेली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही बाब कैद झाली होती. तरुणीच्या स्पर्शाने चौथरा अपवित्र झाल्याचे सांगत देवस्थानने या चौथऱ्याचा दुधाने अभिषेक केला. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जाहीरपणे महिलांच्या प्रवेशासाठी लढा सुरु केला. चौथरा प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला तीनवेळा शिंगणापुरात गेल्या होत्या. मात्र, या तीनही वेळा त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केलेल्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मंदिरात स्त्री-पुरुष असा भेद करता येणार नाही, असा निकाल दिला. मात्र, त्यानंतरही शिंगणापूर देवस्थान चौथरा प्रवेश देण्यास तयार नव्हते. आम्ही पुरुषांनाही चौथऱ्यावर बंदी केली आहे, असे देवस्थान सांगत होते. महिलांनी प्रवेशाची मागणी करु नये, यासाठी पुरुषांनाही चौथरा बंद करण्याची पळवाट देवस्थानने काढली होती. मात्र, देवस्थानच्या या निर्णयामुळे गुढीपाडव्याला कावडींतून गंगाजल घेऊन येणाऱ्या भाविकांनाही प्रवेश बंद झाला. या बाबीमुळे गावातील पुरुष भाविकांच्याही श्रद्धेवर गदा आली. या ग्रामस्थांनी आक्रमक होत चौथरा प्रवेश केल्यामुळे देवस्थानचाही नाईलाज झाला. त्यामुळे अखेर देवस्थानच्या विश्वस्तांना महिलांनाही प्रवेश देण्याची घोषणा करावी लागली. श्री श्री रविशंकर यांना या प्रकरणात मध्यस्थ म्हणून पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांना याविषयी तोडगा काढता आला नाही. २८ नोव्हेंबरला चौथऱ्यावर गेलेली ती तरुणी चौथरा प्रवेश करणारी पहिली महिला ठरली आहे. आता देवस्थानने अधिकृतपणेच ही घोषणा केल्यामुळे कोणती महिला सर्वप्रथम प्रवेश करणार, ही उत्सुकता आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भूमाताच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शिंगणापुरात पोहोचत आहेत. शिंगणापूर देवस्थानने स्त्री-पुरुष भेद संपुष्टात आणल्याने त्र्यंबकेश्वर व अन्य देवस्थानांत आता काय निर्णय होणार याचीही उत्सुकता आहे. या निर्णयाचे पडसाद राज्य व देशात उमटणार आहेत.