शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीची तरुणी रमलीय डाळिंब बागेत

By admin | Updated: December 21, 2015 00:50 IST

जाखणगावची एकता भगतची कहाणी

उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी असे समजले जायचे. कृषिप्रधान देशात शेतकरी हा प्रतिष्ठित व श्रीमंत समजला जायचा. कालांतराने उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती असे समीकरण बनले. शेतीतील बदलते रूप आणि शेतमालाला बाजारपेठेत मिळणारा भाव, यामुळे शेती हा धंदा अडचणीत येत गेला. शिक्षण घेतलेली तरुणाई घाट्यातील शेती करावयास धजत नाही. खटाव तालुक्यातील नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या जाखणगाव येथील शेतकरी कुटुंबातील एकता राजेंद्र भगत याला अपवाद ठरली. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शेतीतच वडिलांना सहकार्य करण्याचा निश्चय केला आहे. एकताचे शिक्षण ईएनटीसी (डिप्लोमा ईन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन) झालेले आहे. वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. वडील शेतकरी असल्यामुळे शेती कामाची लहानपणापासूनची सवय तसेच आवड. त्यामुळे शेतीविषयी अधिक माहिती घेणे तिला अधिक आवडते. वडिलांना शेतात आईदेखील सहकार्य करून हातभार लावते. ‘वडिलांनी शिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद व बळ दिले; परंतु त्या आनंदापेक्षा मी इंजिनिअर जरी झाले तरी माझे शेतीशी असलेले नाते मी कधीच विसरणार नाही. उलट मला शेतातील कामे करणे फार आवडते. मला अद्यापपर्यंत नोकरीच्या पाठीमागे लागावे, असे वाटलेच नाही. उलट माझा मोकळा वेळ मी शेतातच अधिक घालवते. शेती करत असताना आता रासायनिक खतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे मातीचा पोत खराब होत चालला आहे. सेंद्रिय खतांची आणि हे केवळ बोलण्यापुरतेच न ठेवता आमच्या शेतात आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करतो. नवनवीन तंत्रज्ञान तसेच इंटरनेटमुळे जग जवळ आल्यामुळे एकताने घरी बसून इंटरनेटवरून आता प्रचलित होत असलेली हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांचे खाद्य बनवण्याच्या तंत्राचा वापर करून शेतातील पिकांबरोबरच शेतीपूरक व्यवसायालाही महत्त्व देऊन गोठ्यातील जनावरांना देखील सेंद्रिय पद्धतीने खाद्य देऊन त्यांची निगाही राखण्यात एकता कमी पडलेली नाही.नम्रता भोसले