शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अभियांत्रिकीची तरुणी रमलीय डाळिंब बागेत

By admin | Updated: December 21, 2015 00:50 IST

जाखणगावची एकता भगतची कहाणी

उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी असे समजले जायचे. कृषिप्रधान देशात शेतकरी हा प्रतिष्ठित व श्रीमंत समजला जायचा. कालांतराने उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ शेती असे समीकरण बनले. शेतीतील बदलते रूप आणि शेतमालाला बाजारपेठेत मिळणारा भाव, यामुळे शेती हा धंदा अडचणीत येत गेला. शिक्षण घेतलेली तरुणाई घाट्यातील शेती करावयास धजत नाही. खटाव तालुक्यातील नेहमी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या जाखणगाव येथील शेतकरी कुटुंबातील एकता राजेंद्र भगत याला अपवाद ठरली. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शेतीतच वडिलांना सहकार्य करण्याचा निश्चय केला आहे. एकताचे शिक्षण ईएनटीसी (डिप्लोमा ईन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन) झालेले आहे. वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. वडील शेतकरी असल्यामुळे शेती कामाची लहानपणापासूनची सवय तसेच आवड. त्यामुळे शेतीविषयी अधिक माहिती घेणे तिला अधिक आवडते. वडिलांना शेतात आईदेखील सहकार्य करून हातभार लावते. ‘वडिलांनी शिक्षण देऊन मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद व बळ दिले; परंतु त्या आनंदापेक्षा मी इंजिनिअर जरी झाले तरी माझे शेतीशी असलेले नाते मी कधीच विसरणार नाही. उलट मला शेतातील कामे करणे फार आवडते. मला अद्यापपर्यंत नोकरीच्या पाठीमागे लागावे, असे वाटलेच नाही. उलट माझा मोकळा वेळ मी शेतातच अधिक घालवते. शेती करत असताना आता रासायनिक खतांचा वापर अधिक केला जात आहे. त्यामुळे मातीचा पोत खराब होत चालला आहे. सेंद्रिय खतांची आणि हे केवळ बोलण्यापुरतेच न ठेवता आमच्या शेतात आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करतो. नवनवीन तंत्रज्ञान तसेच इंटरनेटमुळे जग जवळ आल्यामुळे एकताने घरी बसून इंटरनेटवरून आता प्रचलित होत असलेली हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जनावरांचे खाद्य बनवण्याच्या तंत्राचा वापर करून शेतातील पिकांबरोबरच शेतीपूरक व्यवसायालाही महत्त्व देऊन गोठ्यातील जनावरांना देखील सेंद्रिय पद्धतीने खाद्य देऊन त्यांची निगाही राखण्यात एकता कमी पडलेली नाही.नम्रता भोसले