शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

गिरगावकर पाणी वाचवण्यासाठी सरसावले

By admin | Updated: May 30, 2016 02:11 IST

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा पाऊस जास्त होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. पण, तरीही पुढच्या वर्षी पाण्याची कमतरता भासू नये आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी गिरगावकर सज्ज झाले आहेत. गिरगावातील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी करण्यात येणार आहे. गिरगाव आणि आजूबाजूच्या परिसरात विहिरी आहेत. पूर्वीच्या काळी या विहिरींचा वापर केला जायचा. पण, गेल्या काही वर्षांत शहरीकरण होताना विहिरींचे मूळ स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे वापरातल्या विहिरी बंद झाल्या. तर, काही ठिकाणी टॉवर झाल्यामुळे विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. जमिनीखाली टाकलेल्या वायर अशा काही कारणांमुळे जिवंत स्रोत मृत झाले आहेत. हे स्रोत जिवंत करण्यासाठी पाहणी सुरू करण्यात आली आहे. आंग्रे वाडी, गोमांतक वाडी आणि साई चौक येथील विहिरींची तपासणी ‘आम्ही गिरगावकर’च्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणी विहिरी आहेत. मात्र, आता त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने पुढाकार घेऊन येथील स्थानिकांशी चर्चा केली. येथील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, पुनर्वापरासाठी काय उपाययोजना आखता येतील, याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा प्रकारे आणि कुठे करता येऊ शकते याची प्राथमिक चर्चा सध्या गिरगावात सुरू असल्याची माहिती ‘आम्ही गिरगावकर’च्या रोहित जाधव यांनी दिली. गिरगावातील काही विहिरींतून पाण्याची चोरी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)