शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गिरगावकर पाणी वाचवण्यासाठी सरसावले

By admin | Updated: May 30, 2016 02:11 IST

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळानंतर सर्वच ठिकाणी पाण्याची साठवण आणि पाण्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा पाऊस जास्त होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. पण, तरीही पुढच्या वर्षी पाण्याची कमतरता भासू नये आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी गिरगावकर सज्ज झाले आहेत. गिरगावातील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी करण्यात येणार आहे. गिरगाव आणि आजूबाजूच्या परिसरात विहिरी आहेत. पूर्वीच्या काळी या विहिरींचा वापर केला जायचा. पण, गेल्या काही वर्षांत शहरीकरण होताना विहिरींचे मूळ स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे वापरातल्या विहिरी बंद झाल्या. तर, काही ठिकाणी टॉवर झाल्यामुळे विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. जमिनीखाली टाकलेल्या वायर अशा काही कारणांमुळे जिवंत स्रोत मृत झाले आहेत. हे स्रोत जिवंत करण्यासाठी पाहणी सुरू करण्यात आली आहे. आंग्रे वाडी, गोमांतक वाडी आणि साई चौक येथील विहिरींची तपासणी ‘आम्ही गिरगावकर’च्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणी विहिरी आहेत. मात्र, आता त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने पुढाकार घेऊन येथील स्थानिकांशी चर्चा केली. येथील विहिरींची पाहणी करण्यात आली असून, पुनर्वापरासाठी काय उपाययोजना आखता येतील, याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा प्रकारे आणि कुठे करता येऊ शकते याची प्राथमिक चर्चा सध्या गिरगावात सुरू असल्याची माहिती ‘आम्ही गिरगावकर’च्या रोहित जाधव यांनी दिली. गिरगावातील काही विहिरींतून पाण्याची चोरी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)