शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

गुलाम अली फक्त चर्चेपुरते?

By admin | Updated: January 19, 2016 02:10 IST

पक्षातून डावलले जात असल्याने आणि गेले काही दिवस प्रसिद्धीपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गझलकार गुलाम अली यांचा

ठाणे : पक्षातून डावलले जात असल्याने आणि गेले काही दिवस प्रसिद्धीपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गझलकार गुलाम अली यांचा कार्यक्रम ठाण्यात घेण्याचे टिष्ट्वट करून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने कार्यक्रमाला विरोध केला असला, तरी भाजपाला मात्र गरज पडली तर संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी लागली आहे. ठाण्यातील पालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतील दोन्ही पक्षांत या मुद्द्यावरून फूट पाडण्याची आव्हाड यांची खेळी तूर्त तरी यशस्वी झाली असली तरी गुलाम अली यांना खरोखरीच निमंत्रण दिले आहे की, चर्चा घडविण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला, हे गुलदस्त्यात आहे. भाजपामधील हिंदुत्ववाद्यांनी मात्र शिवसेनेची री ओढत या कार्यक्रमाला विरोध केला असून एवढ्या वर्षांत कार्यक्रम करीत असूनही आव्हाड यांना आताच गुलाम अली का आठवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.कळव्यात आव्हाडांच्या संघर्ष संस्थेतर्फे १९ फेबु्रवारीला ठाणे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात गुलाम अली यांना आणण्याचे टिष्ट्वट त्यांनी रविवारी केले. त्यातून अपेक्षेनुसार वादाची ठिणगी पडली. मुंबईत शिवसेनेने अली यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. तशीच भूमिका त्यांनी या कार्यक्रमाबाबतही घेतली. गृह खाते ताब्यात असलेल्या भाजपाला मात्र आव्हाडांना संरक्षण हवे असेल आणि राज्य सरकारकडे त्यांनी ते मागितले तर ते नक्कीच पुरवू, असा दावा ठाणे शहर भाजपाने केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यानिमित्ताने पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले. या कार्यक्रमाच्या घोषणेनिमित्ताने बऱ्याच काळानंतर चर्चेत येण्याचा आव्हाड यांचा हेतू मात्र साध्य झाला. बिल्डर परमार आत्महत्या प्रकरणामुळे गेले काही दिवस त्यांच्यासह पक्षातील त्याच्या गटातील नगरसेवक बचावाच्या पवित्र्यात होते. वरिष्ठांकडून साथ मिळत नसल्याचे सांगत त्या नगरसेवकांनी थेट पक्ष सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याबाबत मंगळवारी पक्षाने बैठक बोलावली आहे. नेहमी स्टंट करून चर्चेत राहण्याची सवय असल्याने आव्हाड यांनी पुन्हा तशीच खेळी केल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांचीही त्यांच्यावर वक्रदृष्टी झाल्याने कदाचित पुन्हा केंद्रस्थानी येण्यासाठी आणि आपल्या मतदारांची नाळ अधिक घट्ट बांधण्यासाठी त्यांनी हा अट्टहास केल्याची चर्चा मुंब्रा परिसरात रंगू लागली आहे. गेली १० ते १५ वर्षे आव्हाड विविध कार्यक्रम घेत असतांना आताच त्यांना गुलाम अली यांचा कार्यक्रम घेण्याचे का आठवले, असा सवाल भाजपामधील हिंदुत्ववादी गटाने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)