शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम अली फक्त चर्चेपुरते?

By admin | Updated: January 19, 2016 02:10 IST

पक्षातून डावलले जात असल्याने आणि गेले काही दिवस प्रसिद्धीपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गझलकार गुलाम अली यांचा

ठाणे : पक्षातून डावलले जात असल्याने आणि गेले काही दिवस प्रसिद्धीपासून दूर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गझलकार गुलाम अली यांचा कार्यक्रम ठाण्यात घेण्याचे टिष्ट्वट करून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने कार्यक्रमाला विरोध केला असला, तरी भाजपाला मात्र गरज पडली तर संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी लागली आहे. ठाण्यातील पालिका निवडणुकीच्या तोंडावर युतीतील दोन्ही पक्षांत या मुद्द्यावरून फूट पाडण्याची आव्हाड यांची खेळी तूर्त तरी यशस्वी झाली असली तरी गुलाम अली यांना खरोखरीच निमंत्रण दिले आहे की, चर्चा घडविण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला, हे गुलदस्त्यात आहे. भाजपामधील हिंदुत्ववाद्यांनी मात्र शिवसेनेची री ओढत या कार्यक्रमाला विरोध केला असून एवढ्या वर्षांत कार्यक्रम करीत असूनही आव्हाड यांना आताच गुलाम अली का आठवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.कळव्यात आव्हाडांच्या संघर्ष संस्थेतर्फे १९ फेबु्रवारीला ठाणे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यात गुलाम अली यांना आणण्याचे टिष्ट्वट त्यांनी रविवारी केले. त्यातून अपेक्षेनुसार वादाची ठिणगी पडली. मुंबईत शिवसेनेने अली यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. तशीच भूमिका त्यांनी या कार्यक्रमाबाबतही घेतली. गृह खाते ताब्यात असलेल्या भाजपाला मात्र आव्हाडांना संरक्षण हवे असेल आणि राज्य सरकारकडे त्यांनी ते मागितले तर ते नक्कीच पुरवू, असा दावा ठाणे शहर भाजपाने केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यानिमित्ताने पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले. या कार्यक्रमाच्या घोषणेनिमित्ताने बऱ्याच काळानंतर चर्चेत येण्याचा आव्हाड यांचा हेतू मात्र साध्य झाला. बिल्डर परमार आत्महत्या प्रकरणामुळे गेले काही दिवस त्यांच्यासह पक्षातील त्याच्या गटातील नगरसेवक बचावाच्या पवित्र्यात होते. वरिष्ठांकडून साथ मिळत नसल्याचे सांगत त्या नगरसेवकांनी थेट पक्ष सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याबाबत मंगळवारी पक्षाने बैठक बोलावली आहे. नेहमी स्टंट करून चर्चेत राहण्याची सवय असल्याने आव्हाड यांनी पुन्हा तशीच खेळी केल्याचे सांगितले जाते. वरिष्ठांचीही त्यांच्यावर वक्रदृष्टी झाल्याने कदाचित पुन्हा केंद्रस्थानी येण्यासाठी आणि आपल्या मतदारांची नाळ अधिक घट्ट बांधण्यासाठी त्यांनी हा अट्टहास केल्याची चर्चा मुंब्रा परिसरात रंगू लागली आहे. गेली १० ते १५ वर्षे आव्हाड विविध कार्यक्रम घेत असतांना आताच त्यांना गुलाम अली यांचा कार्यक्रम घेण्याचे का आठवले, असा सवाल भाजपामधील हिंदुत्ववादी गटाने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)