शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये घरकुल योजनेला ‘घरघर’

By admin | Updated: March 3, 2017 11:06 IST

नाशिक शहर झोपडपट्टीमुक्ती करण्यासाठी महापालिकेने सोळा हजार घरांचे उद्दिष्ट ठेऊन घरकुल योजना राबवली. मात्र घरं बांधली केवळ पाच हजारच.

ऑनलाइन लोकमत/संजय पाठक

नाशिक, दि. 3 -  झोपडपट्टीमुक्ती शहर करण्यासाठी महापालिकेने गेल्या दहा वर्षांत साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून अद्यापही घरकुल योजना पूर्ण झालेली नाही. सोळा हजार घरकुलांचे उद्दिष्ट कमी होऊन ते थेट साडेसात हजारांवर आणण्यात आले. परंतु अजूनही दीड हजार घरे वापराविना पडून आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणताही भाग झोपडपट्टीमुक्त झालेला नसल्याने घरकुल योजनेलाच घरघर लागल्याचे दिसत आहेत.

विशेष म्हणजे अगोदरच्या घरकुल योजनेची वासलात लागली असताना आता आणखी प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे अगोदरच्या योजनाच यशस्वी नसताना नवीन योजना कशी यशस्वी होईल, अशी शंका आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत नाशिक शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सहभाग घेतला आहे.

२००५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत महापालिकेने १६ हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी ३३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. हा सर्व निधी खर्च झाला असून, अद्याप घरकुल योजना यशस्वी झालेली नाही. मुळातच घरकुल योजना ही झोपडपट्टी असलेल्या शासकीय भूखंडांवरच राबवायचे ठरले होते. परंतु महापालिकेने ती राबविताना सोयीच्या जागा निवडल्या.

शहराबाहेर चुंचाळे शिवारात घरकुल योजनेंतर्गत सहा हजार घरे बांधली. मोलमजुरी करणाऱ्यांना शहरापासून दूरवर घरे घेण्यात स्वारस्य नसल्याने ही घरे पडून आहेत. त्यातच अनेक ठिकाणी जागेचा आणि लाभपात्र व्यक्ती मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्याने महापलिकेने घरकुलांची संख्या घटवून साडेबारा हजार केली. त्यानंतर आणखी घटवून ९ हजार ६०० केली आणि आता तर त्याहीपेक्षा घटवून ७ हजार ४६० इतकी केली आहे.

त्यात आत्तापर्यंत फक्त ५१६० घरकुले तयार आहेत. परंतु दीड हजार लाभपात्र व्यक्तींना घरकुलेच मिळाली नसल्याचे दिसत आहे. शहरातील गंजमाळ भागात भीमवाडी येथे झोपडपट्टीच्या ठिकाणीच घरकुल योजना राबविण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरित करून त्या जागी बांधकाम सुरू झाले, परंतु पाच वर्षे झाली तरी हे काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांना तंबू टाकून त्यातच जीवन कंठावे लागत आहे. तर वडाळा आणि शिवाजीवाडी भागात महापालिकेने घरकुल योजनेंतर्गत लाभार्थींना घरे दिली, मात्र त्यांनी ती भाड्याने दिल्याचे आढळले होते. वडाळागावात १८० लाभार्थ्यांनी असा उद्योग केल्याचे आढळले होते. मूळ मुद्दा म्हणजे महापालिका हद्दीत १५८ झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी १०३ झोपडपट्ट्या शासकीय आणि महापालिकेच्या जागेवर असून, आता घरकुल योजनेला बारा वर्षे झालीत, परंतु आजवर एकही भूखंड झोपडपट्टीमुक्त झालेला नाही, हे विशेष होय.