शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

नाशिकमध्ये घरकुल योजनेला ‘घरघर’

By admin | Updated: March 3, 2017 11:06 IST

नाशिक शहर झोपडपट्टीमुक्ती करण्यासाठी महापालिकेने सोळा हजार घरांचे उद्दिष्ट ठेऊन घरकुल योजना राबवली. मात्र घरं बांधली केवळ पाच हजारच.

ऑनलाइन लोकमत/संजय पाठक

नाशिक, दि. 3 -  झोपडपट्टीमुक्ती शहर करण्यासाठी महापालिकेने गेल्या दहा वर्षांत साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून अद्यापही घरकुल योजना पूर्ण झालेली नाही. सोळा हजार घरकुलांचे उद्दिष्ट कमी होऊन ते थेट साडेसात हजारांवर आणण्यात आले. परंतु अजूनही दीड हजार घरे वापराविना पडून आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणताही भाग झोपडपट्टीमुक्त झालेला नसल्याने घरकुल योजनेलाच घरघर लागल्याचे दिसत आहेत.

विशेष म्हणजे अगोदरच्या घरकुल योजनेची वासलात लागली असताना आता आणखी प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे अगोदरच्या योजनाच यशस्वी नसताना नवीन योजना कशी यशस्वी होईल, अशी शंका आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत नाशिक शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सहभाग घेतला आहे.

२००५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत महापालिकेने १६ हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी ३३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. हा सर्व निधी खर्च झाला असून, अद्याप घरकुल योजना यशस्वी झालेली नाही. मुळातच घरकुल योजना ही झोपडपट्टी असलेल्या शासकीय भूखंडांवरच राबवायचे ठरले होते. परंतु महापालिकेने ती राबविताना सोयीच्या जागा निवडल्या.

शहराबाहेर चुंचाळे शिवारात घरकुल योजनेंतर्गत सहा हजार घरे बांधली. मोलमजुरी करणाऱ्यांना शहरापासून दूरवर घरे घेण्यात स्वारस्य नसल्याने ही घरे पडून आहेत. त्यातच अनेक ठिकाणी जागेचा आणि लाभपात्र व्यक्ती मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्याने महापलिकेने घरकुलांची संख्या घटवून साडेबारा हजार केली. त्यानंतर आणखी घटवून ९ हजार ६०० केली आणि आता तर त्याहीपेक्षा घटवून ७ हजार ४६० इतकी केली आहे.

त्यात आत्तापर्यंत फक्त ५१६० घरकुले तयार आहेत. परंतु दीड हजार लाभपात्र व्यक्तींना घरकुलेच मिळाली नसल्याचे दिसत आहे. शहरातील गंजमाळ भागात भीमवाडी येथे झोपडपट्टीच्या ठिकाणीच घरकुल योजना राबविण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरित करून त्या जागी बांधकाम सुरू झाले, परंतु पाच वर्षे झाली तरी हे काम पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांना तंबू टाकून त्यातच जीवन कंठावे लागत आहे. तर वडाळा आणि शिवाजीवाडी भागात महापालिकेने घरकुल योजनेंतर्गत लाभार्थींना घरे दिली, मात्र त्यांनी ती भाड्याने दिल्याचे आढळले होते. वडाळागावात १८० लाभार्थ्यांनी असा उद्योग केल्याचे आढळले होते. मूळ मुद्दा म्हणजे महापालिका हद्दीत १५८ झोपडपट्ट्या आहेत. त्यापैकी १०३ झोपडपट्ट्या शासकीय आणि महापालिकेच्या जागेवर असून, आता घरकुल योजनेला बारा वर्षे झालीत, परंतु आजवर एकही भूखंड झोपडपट्टीमुक्त झालेला नाही, हे विशेष होय.