शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कुचकामी सरकारविरोधी संघर्षासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: August 21, 2016 02:04 IST

केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात

मुंबई : केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत असून, त्यांच्याविरुद्ध संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने शनिवारी झालेल्या राष्ट्रीय युवक काँग्रेस मेळाव्यात गुलाम नबी आझाद हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा ब्रार, राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते.तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पक्षाचे आमदार, पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.‘राजीव गांधींच्या धोरणांची आज देशाला गरज’राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत गुलाम नबी आझाद म्हणाले, राष्ट्राच्या उभारणीत राजीव यांनी मोलाचा हातभार लावला. तरुणांना एकत्र करत संधी देण्याचे धोरण त्यांनी राबवले. सध्याचे सरकार मात्र तरुणाईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. विकासकामांऐवजी पक्षाचा वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत आहे. याविरुद्ध सर्वांनी संघटितपणे आवाज उठवावा. तर, राजीव गांधी यांनी राष्ट्राची उभारणी करतानाच सर्वसामान्य माणसांचाही तेवढ्याच तळमळीने विचार केला. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे धोरण राबवण्याची गरज आहे, असे मत सचिन पायलट यांनी व्यक्त केले. या वेळी अमरिंदर सिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम आदींची भाषणे झाली.