शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

कुचकामी सरकारविरोधी संघर्षासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: August 21, 2016 02:04 IST

केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात

मुंबई : केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत असून, त्यांच्याविरुद्ध संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने शनिवारी झालेल्या राष्ट्रीय युवक काँग्रेस मेळाव्यात गुलाम नबी आझाद हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा ब्रार, राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते.तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पक्षाचे आमदार, पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.‘राजीव गांधींच्या धोरणांची आज देशाला गरज’राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत गुलाम नबी आझाद म्हणाले, राष्ट्राच्या उभारणीत राजीव यांनी मोलाचा हातभार लावला. तरुणांना एकत्र करत संधी देण्याचे धोरण त्यांनी राबवले. सध्याचे सरकार मात्र तरुणाईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. विकासकामांऐवजी पक्षाचा वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत आहे. याविरुद्ध सर्वांनी संघटितपणे आवाज उठवावा. तर, राजीव गांधी यांनी राष्ट्राची उभारणी करतानाच सर्वसामान्य माणसांचाही तेवढ्याच तळमळीने विचार केला. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे धोरण राबवण्याची गरज आहे, असे मत सचिन पायलट यांनी व्यक्त केले. या वेळी अमरिंदर सिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम आदींची भाषणे झाली.