शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कुचकामी सरकारविरोधी संघर्षासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: August 21, 2016 02:04 IST

केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात

मुंबई : केंद्र व महाराष्ट्रातील सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत असून, त्यांच्याविरुद्ध संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने शनिवारी झालेल्या राष्ट्रीय युवक काँग्रेस मेळाव्यात गुलाम नबी आझाद हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा ब्रार, राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते.तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि पक्षाचे आमदार, पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.‘राजीव गांधींच्या धोरणांची आज देशाला गरज’राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत गुलाम नबी आझाद म्हणाले, राष्ट्राच्या उभारणीत राजीव यांनी मोलाचा हातभार लावला. तरुणांना एकत्र करत संधी देण्याचे धोरण त्यांनी राबवले. सध्याचे सरकार मात्र तरुणाईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. विकासकामांऐवजी पक्षाचा वैयक्तिक ‘अजेंडा’ राबवून देशातील राष्ट्रीय एकात्मता व शांतता धोक्यात घालण्याचे काम सरकार करत आहे. याविरुद्ध सर्वांनी संघटितपणे आवाज उठवावा. तर, राजीव गांधी यांनी राष्ट्राची उभारणी करतानाच सर्वसामान्य माणसांचाही तेवढ्याच तळमळीने विचार केला. आपणही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे धोरण राबवण्याची गरज आहे, असे मत सचिन पायलट यांनी व्यक्त केले. या वेळी अमरिंदर सिंग राजा ब्रार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम आदींची भाषणे झाली.