शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

परिवर्तनाच्या लढार्ईस सज्ज व्हा

By admin | Updated: March 21, 2016 03:22 IST

केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना राज्यघटनेशी काही देणेघेणे नाही. मनुस्मृतीला मानणारे कोण आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे

नागपूर : केंद्रातील मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. त्यांना राज्यघटनेशी काही देणेघेणे नाही. मनुस्मृतीला मानणारे कोण आहेत. याची जाणीव सर्वांनाच आहे. अशा शक्तीविरोधात लढण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईसाठी कार्यक र्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी रविवारी येथे केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचा समारोप ११ एप्रिलला येथील कस्तूरचंद पार्क येथे जाहीर सभेच्या माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाच्या तयारीसाठी राणी कोठी येथे आयोजित विदर्भातील कार्यकर्त्याच्या बैठकीत मोहन प्रकाश यांनी मार्गदर्शन केले. प्र्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव मुकु ल वासनिक , माजी खा. विलास मुत्तेमवार, विधान परिषदेतील गटनेते आ. शरद रणपिसे, विधानसभेतील पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदी उपस्थित होते. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसने विधान भवनावर काढलेल्या मोर्चाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ११ एप्रिलचाही कार्यक्रम असाच भव्य होणार आहे. त्यात देशभरातील काँग्रेसचे नेते सहभागी होतील, अशी माहिती अशोक चव्हाण यांनीदिली. (प्रतिनिधी)