शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

सकारात्मक ऊर्जा मिळवा

By admin | Updated: February 12, 2017 00:31 IST

नीला सत्यनारायण : आंतरभारती शिक्षण मंडळातर्फे कांचन परुळेकर यांना ‘कुुसुम पुरस्कार’

कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आणि दु:खे असतात. त्यामुळे हे सगळं माझ्यासोबत का घडतंय असा विचार न करता घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींतून सकारात्मक ऊर्जा मिळवा, चौकटीबाहेर जाऊन प्रश्नांचा विचार करा. त्यातूनच उत्तरं मिळत जातात. जगण्याचा दृष्टिकोन बदलतो, असा कानमंत्र माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महिलांना दिला. शाहू स्मारक भवन येथे शनिवारी आंतरभारती शिक्षण मंडळाच्यावतीने कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुचेता कोरगावकर होत्या. रोख रुपये २५ हजार, शाल, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते. नीला सत्यनारायण यांनी आपल्या कथांच्या माध्यमातून उपस्थित महिलांना जगण्याचा मूलमंत्र दिला. त्या म्हणाल्या, गृहिणी असलेल्या महिलांना बऱ्याच वेळा न्यूनगंड असतो. मात्र, स्त्रीने कुटुंबाचा सांभाळ करण्यास नकार दिला तर कुटुंब विस्कळीत होते. कांचन परुळेकर म्हणाल्या, महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर काढून त्यांच्या शक्तीचा वापर कुटुंबाच्या, समाजाच्या कल्याणासाठी करीत ‘स्वयंसिद्धा’ने त्यांना आत्मनिर्भर केले आहे. महिलांना राजकारणात आरक्षण मिळाले असले तरी ‘वहिनीसाहेबां’च्या वतीने ‘साहेब’च कारभार करतात. त्यामुळे महिलांना राजकीयदृष्ट्या साक्षर करणे गरजेचे आहे. सुचेता कोरगावकर यांनी समारोप केला. तनुजा शिपूरकर यांनी प्रास्ताविक, इंद्रायणी पाटील यांनी सूत्रसंचालन, तर एम. एस. पाटोळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे शनिवारी नीला सत्यनारायण यांच्या हस्ते कांचन परुळेकर यांना ‘कुसुम पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सुचेता पडळकर, विनय पाटगावकर, सुचेता कोरगावकर, पल्लवी कोरगावकर, तनुजा शिपूरकर, एम. एस. पाटोळे उपस्थित होते.