शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्या लाठया

By admin | Updated: September 20, 2016 18:20 IST

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी धुळे तालुक्यातील शेतकरी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. २० : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी धुळे तालुक्यातील शेतकरी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तेथे त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर तुफान दगडफेक केली. अखेर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार केला. या परिस्थितीमुळे कर्मचारी भेदरले आहेत. या दगडफेकीमुळे पोलीस, कर्मचारी व शेतकरी मिळून आठ ते दहा जण जखमी झाले आहेत.

धुळे तालुक्यातील भदाणे, खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले, कावठी, मेहेरगाव, शिरधाने आदी गावांमधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी सकाळी अचानक मोर्चा काढला़ त्याबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशाद्वाराजवळच सुमारे ५०० ते ७०० शेतकऱ्यांनी ठाण मांडले होते़ अक्कलपाड्याच्या डाव्या कालव्यातून आता लगेच पाणी सोडा, अशी त्यांची मागणी होती.

त्यासाठी त्यांनी रेटा लावला होता. अशातच जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आल्यानंतर त्यांचे वाहन प्रवेशद्वाराजवळच अडविण्यात आले़ त्यानंतर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेले़ त्यावेळी सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ हेही उपस्थित होते. चर्चा आटोपल्यानंतर माहिती देण्यासाठी अधिकारी येत असताना शेतकऱ्यांकडून आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली़

पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला़ विशेष म्हणजे मोर्चात कोणीही प्रमुख पदाधिकारी असे कोणीही नव्हते़ त्यामुळे कोणीच कोणाचे ऐकत नव्हते़ या दगडफेकीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फुटल्या़ तसेच दोन कर्मचाऱ्यांसह ४ ते ५ पोलीस आणि तेवढेच शेतकरी जखमी झाले आहेत़ जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेनंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना डाव्या कालव्याचा प्रश्न दहा दिवसांत मार्गी लावला जाईल. घडलेल्या प्रकारासंदर्भात पोलीस प्रशासन योग्य ती भूमिका बजावेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रमुख अधिकारी उपस्थित होते.