शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

By admin | Updated: August 18, 2015 23:02 IST

राष्ट्रवादीचा चिंतन मेळावा : सुनील तटकरे म्हणाले... एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.

रत्नागिरी : चिपळूणचा राजकीय धसका घेऊन पक्ष सोडला, असे जर उदय सामंत म्हणत असतील तर त्यांची भूमिका पूर्णत: चुकीची आहे. पक्षाने ज्यांना महत्त्वाची पदे, मंत्रीपद, पालकमंत्रीपद दिले त्याने आयत्यावेळी एबी फॉर्म घेऊनही पक्ष बदलला, स्वार्थासाठी विश्वासघात केला, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला, तर सर्व पदे भोगूनही विश्वासघात करणाऱ्या या नादान माणसाचे जाहीर सभा घेऊन राजकीय वस्त्रहरण केले पाहिजे, असा तिखट वार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या चिंतन मेळाव्यात केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याला मंगळवारी रत्नागिरी येथून सुरूवात झाली. यानिमित्ताने साईमंगल कार्यालयात पक्षाचा जिल्हा चिंतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राजाभाऊ लिमये, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी प्रदेश युवकचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, संदेश कोंडविलकर, बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तटकरे यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर जळजळीत टीका केली. मोदी हे देशाच्या संसदेपेक्षा परदेशातच अधिक काळ असतात. पत्रकारांना परदेश दौऱ्यावर नेण्याचा व पारदर्शकता दाखवण्याचा पायंडा यांनी मोडला आहे. आपले भांडे फुटू नये म्हणून हे सारे घडते आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या सध्याच्या किमतीनुसार ३५ व २५ रुपये प्रतिलिटर असायला हवे होते, असे असतानाही ७० रुपयाने विकले जात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सेनेच्या कुवारबाव येथे काढलेल्या मोर्चात माणसेच दिसली नाहीत. येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना या मोर्चात कार्यकर्ते, लोकांना का एकत्र आणता आले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. एक काळ भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत आले की मातोश्रीवर यायचेच. आज असे होत नाही. याचाच अर्थ शिवसेनेच्या हाती आता रिमोटच राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)तुम्हीच याला संपवा...भास्कर जाधवना बदला व उदय सामंतना मंत्रीपद द्या, पालकमंत्रीपद द्या, असा तगादा त्यावेळी लावणाऱ्यांनी हा विश्वासघात उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यावेळी बदलाची मागणी करणाऱ्यांना आता माझे सांगणे आहे की, त्यांनी हे पाप संपवले पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले. तटकरे म्हणाले...एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.कार्यकर्त्यांनी २०१६मधील पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तयारीला लागावे.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनेला बळ देण्यासाठी जाधवांनी कमान सांभाळावी.