शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

By admin | Updated: August 18, 2015 23:02 IST

राष्ट्रवादीचा चिंतन मेळावा : सुनील तटकरे म्हणाले... एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.

रत्नागिरी : चिपळूणचा राजकीय धसका घेऊन पक्ष सोडला, असे जर उदय सामंत म्हणत असतील तर त्यांची भूमिका पूर्णत: चुकीची आहे. पक्षाने ज्यांना महत्त्वाची पदे, मंत्रीपद, पालकमंत्रीपद दिले त्याने आयत्यावेळी एबी फॉर्म घेऊनही पक्ष बदलला, स्वार्थासाठी विश्वासघात केला, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला, तर सर्व पदे भोगूनही विश्वासघात करणाऱ्या या नादान माणसाचे जाहीर सभा घेऊन राजकीय वस्त्रहरण केले पाहिजे, असा तिखट वार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या चिंतन मेळाव्यात केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याला मंगळवारी रत्नागिरी येथून सुरूवात झाली. यानिमित्ताने साईमंगल कार्यालयात पक्षाचा जिल्हा चिंतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राजाभाऊ लिमये, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी प्रदेश युवकचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, संदेश कोंडविलकर, बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तटकरे यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर जळजळीत टीका केली. मोदी हे देशाच्या संसदेपेक्षा परदेशातच अधिक काळ असतात. पत्रकारांना परदेश दौऱ्यावर नेण्याचा व पारदर्शकता दाखवण्याचा पायंडा यांनी मोडला आहे. आपले भांडे फुटू नये म्हणून हे सारे घडते आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या सध्याच्या किमतीनुसार ३५ व २५ रुपये प्रतिलिटर असायला हवे होते, असे असतानाही ७० रुपयाने विकले जात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सेनेच्या कुवारबाव येथे काढलेल्या मोर्चात माणसेच दिसली नाहीत. येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना या मोर्चात कार्यकर्ते, लोकांना का एकत्र आणता आले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. एक काळ भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत आले की मातोश्रीवर यायचेच. आज असे होत नाही. याचाच अर्थ शिवसेनेच्या हाती आता रिमोटच राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)तुम्हीच याला संपवा...भास्कर जाधवना बदला व उदय सामंतना मंत्रीपद द्या, पालकमंत्रीपद द्या, असा तगादा त्यावेळी लावणाऱ्यांनी हा विश्वासघात उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यावेळी बदलाची मागणी करणाऱ्यांना आता माझे सांगणे आहे की, त्यांनी हे पाप संपवले पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले. तटकरे म्हणाले...एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.कार्यकर्त्यांनी २०१६मधील पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तयारीला लागावे.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनेला बळ देण्यासाठी जाधवांनी कमान सांभाळावी.