शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

By admin | Updated: August 18, 2015 23:02 IST

राष्ट्रवादीचा चिंतन मेळावा : सुनील तटकरे म्हणाले... एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.

रत्नागिरी : चिपळूणचा राजकीय धसका घेऊन पक्ष सोडला, असे जर उदय सामंत म्हणत असतील तर त्यांची भूमिका पूर्णत: चुकीची आहे. पक्षाने ज्यांना महत्त्वाची पदे, मंत्रीपद, पालकमंत्रीपद दिले त्याने आयत्यावेळी एबी फॉर्म घेऊनही पक्ष बदलला, स्वार्थासाठी विश्वासघात केला, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला, तर सर्व पदे भोगूनही विश्वासघात करणाऱ्या या नादान माणसाचे जाहीर सभा घेऊन राजकीय वस्त्रहरण केले पाहिजे, असा तिखट वार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या चिंतन मेळाव्यात केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याला मंगळवारी रत्नागिरी येथून सुरूवात झाली. यानिमित्ताने साईमंगल कार्यालयात पक्षाचा जिल्हा चिंतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राजाभाऊ लिमये, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी प्रदेश युवकचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, संदेश कोंडविलकर, बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तटकरे यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर जळजळीत टीका केली. मोदी हे देशाच्या संसदेपेक्षा परदेशातच अधिक काळ असतात. पत्रकारांना परदेश दौऱ्यावर नेण्याचा व पारदर्शकता दाखवण्याचा पायंडा यांनी मोडला आहे. आपले भांडे फुटू नये म्हणून हे सारे घडते आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या सध्याच्या किमतीनुसार ३५ व २५ रुपये प्रतिलिटर असायला हवे होते, असे असतानाही ७० रुपयाने विकले जात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सेनेच्या कुवारबाव येथे काढलेल्या मोर्चात माणसेच दिसली नाहीत. येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना या मोर्चात कार्यकर्ते, लोकांना का एकत्र आणता आले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. एक काळ भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत आले की मातोश्रीवर यायचेच. आज असे होत नाही. याचाच अर्थ शिवसेनेच्या हाती आता रिमोटच राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)तुम्हीच याला संपवा...भास्कर जाधवना बदला व उदय सामंतना मंत्रीपद द्या, पालकमंत्रीपद द्या, असा तगादा त्यावेळी लावणाऱ्यांनी हा विश्वासघात उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यावेळी बदलाची मागणी करणाऱ्यांना आता माझे सांगणे आहे की, त्यांनी हे पाप संपवले पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले. तटकरे म्हणाले...एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.कार्यकर्त्यांनी २०१६मधील पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तयारीला लागावे.रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनेला बळ देण्यासाठी जाधवांनी कमान सांभाळावी.