शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

‘जेनेटिक प्रॉब्लेम’ची मनसेत लागण

By admin | Updated: September 8, 2014 02:56 IST

पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे.

संदीप प्रधान, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विधानसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार सुरू केल्याने या पक्षाचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर, राम कदम आणि संजय घाडी अशा काही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे मैदान सोडण्याची तयारी केल्याची या पक्षात चर्चा सुरू झाली आहे.राज यांनी आपल्या या विधानाचे खुलासे केले असले तरी ठामपणे निवडणूक लढवणारच असे स्पष्ट केलेले नाही. त्याचा परिणाम म्हणून की काय किंवा लोकसभा निकालानंतर विजयाची खात्री नसल्याने मनसेच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत शिवडीतून बाळा नांदगावकर हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. मनसेचे आमदार राम कदम हे मनसेतून भाजपामध्ये जाण्याच्या खटपटीत असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले. कदम यांच्या कार्यशैलीवरून त्यांचे राज यांच्याशी खटके उडाले. त्यानंतरही त्यांची उमेदवारी पक्की होती. परंतु आता त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातून दिलीप लांडे यांना उमेदवारी देण्याचे घाटत असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले आदित्य शिरोडकर हे वरळीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र आता तेही फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. मागील विधानसभा निवडणूक विलेपार्ले मतदारसंघातून लढवलेले शिरीष पारकर हे गेले दीड वर्ष पक्षात दुर्लक्षित आहेत. त्यामुळे तेही पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता नाही.लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली गेलेले महेश मांजरेकर व अभिजित पानसे विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब अजमावणार किंवा कसे, याबाबत चित्र धूसर आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना अचानक चिपळूणची तर संजय घाडी यांना कणकवलीची एसटी पकडून तेथे उमेदवारीकरिता जाण्याचे फर्मान ‘कृष्णकुंज’कडून काढण्यात आले आहे. मात्र पक्षाकरिता अनुकूल वातावरण नसताना इतक्या ऐनवेळी तेथे जाऊन पराभव पत्करण्यास व खिशाला खार लावून घेण्यास या दोघांकडून का-कू केले जात आहे. सध्या रत्नागिरीकरिताही ‘कृष्णकुंज’कडून उमेदवाराचा शोध सुरू असल्याने रत्नागिरीशी दुरान्वयाने का होईना संबंध असलेले मनसे नेते धास्तावले आहेत. त्याचवेळी परशुराम उपरकर (सावंतवाडी), वैभव खेडेकर (दापोली) तर अधिक शिरोडकर यांचे पुत्र अ‍ॅड. राजेंद्र शिरोडकर (मलबार हिल) यांना वर्षभरापूर्वी या मतदारसंघात काम सुुरू करण्याचा आदेश राज यांनी दिल्याने ते निवडणुकीची कसून तयारी करीत आहेत.