शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सर्वसामान्य समभागधारकांना दिलासा नाही

By admin | Updated: July 11, 2017 05:44 IST

टाटा समूहाच्या सर्वसामान्य समभागधारकांनी केलेल्या प्रातिनिधिक दाव्यावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टाटा समूहाच्या सर्वसामान्य समभागधारकांनी केलेल्या प्रातिनिधिक दाव्यावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविल्यानंतर त्याच दिवशी शेअर बाजारात टाटा समूहाचे शेअर्स गडगडले. त्यामुळे सर्वसामान्य समभागधारकांना ४१ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. आता ही नुकसानभरपाई टाटा समूहानेच करावी, अशी मागणी या प्रातिनिधिक दाव्याद्वारे केली होती.प्रमोद शहा व अन्य पाच जणांनी सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटविण्याच्या टाटा समूहाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मिस्त्री यांना बेकायदा व मनमानी करत अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे. तसेच २४ आॅक्टोबर रोजी मिस्त्री यांना पदावरून हटविल्यामुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या आठ कंपन्यांचे शेअर्सचे भाव गडगडले. त्यामुळे टाटा समूहानेच नुकसानभरपाई करावी, अशी विनंती दाव्यात करण्यात आली आहे.तत्पूर्वी या पाच समभागधारकांनी दिवाणी दंडसंहितेच्या नियम ८नुसार (एक किंवा त्याहून अधिक लोक न्यायालयाच्या परवानगीने प्रातिनिधिक दावा दाखल करू शकतात) दावा दाखल करण्याची परवानही मागितली होती. डिसेंबरमध्ये न्या. एस. जे. काथावाला यांनी या याचिकाकर्त्यांना प्रातिनिधिक दावा दाखल करण्याची परवानगी दिली होती. मात्र सोमवारी न्या. एस. सी. गुप्ते यांनी हा दावा फेटाळला. ‘काही सर्वसामान्य समभागधारकांनी दाखल केलेल्या दाव्याला ‘प्रातिनिधिक दावा’ म्हटले जाऊ शकत नाही,’ असे न्या. एस. सी. गुप्ते यांनी स्पष्ट करत दाव्यावरील सुनावणीस नकार दिला.