शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नवकल्पनांनी घडतेय पिढी

By admin | Updated: May 1, 2017 05:10 IST

विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतात. मात्र केवळ अभ्यास एके अभ्यास उपक्रमाने

राजानंद मोरे /पुणेविविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतात. मात्र केवळ अभ्यास एके अभ्यास उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चांगले गुण मिळूनही अनेकदा हे विद्यार्थी समाजजीवनात मात्र अपयशी ठरतात. येथील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल मात्र त्यास अपवाद आहे.देशाची भावी पिढी घडवायची असेल तर केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही. ज्ञानार्जनाबरोबरच संस्कारक्षम नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होणे आवश्यक आहे. मात्र फार थोड्या शाळांमध्ये अशाप्रकारचे शिक्षण दिले जाते. केवळ पुस्तकामध्ये दिलेल्या मजकुराची घोकंपट्टी करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना व्यासपीठच मिळत नाही. न्यू इंग्लिश स्कूलने मात्र नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कंबर कसली आहे. शाळेमध्ये यावर्षी ‘अहम भारत’ हा उपक्रम राबविला जात आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याचे धडे दिले जातात. ‘मी म्हणजेच भारत’ अशी भावना त्यांच्यात निर्माण केली जात आहे. स्वच्छतेपासून वाहतूक नियमांची माहिती देण्यापर्यंत विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी परमवीर चक्र, भारतरत्न मिळालेल्यांची माहिती, त्यावर व्याख्यान, पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी दिली.प्रत्येक भाषा विषयासह इतर विषयांची विद्यार्थ्यांना गोडी लागण्यासाठीही दर आठवडा व महिन्याचा एक दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयाचे मंडळ शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची गोडी वाढविण्यासाठी दर पंधरा दिवसांनी समाजसेवा शिबीर घेतले जाते. मागील वर्षी रात्रशाळा भरवून विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव देण्यात आला होता. प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. त्यामध्ये सर्व शिक्षकही उत्स्फुर्तपणे भाग घेतात. विद्यार्थ्यांपर्यंत आगळ््यावेगळ््या पद्धतीने ज्ञान पोहचवून त्यांची बौध्दिक क्षमता वाढविणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे, हा त्यामागचा उद्देश आहे.- नागेश मोने, मुख्याध्यापक, न्यु इंग्लिश स्कूल, पुणे