शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

नवकल्पनांनी घडतेय पिढी

By admin | Updated: May 1, 2017 05:10 IST

विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतात. मात्र केवळ अभ्यास एके अभ्यास उपक्रमाने

राजानंद मोरे /पुणेविविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी शाळा प्रयत्नशील असतात. मात्र केवळ अभ्यास एके अभ्यास उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चांगले गुण मिळूनही अनेकदा हे विद्यार्थी समाजजीवनात मात्र अपयशी ठरतात. येथील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल मात्र त्यास अपवाद आहे.देशाची भावी पिढी घडवायची असेल तर केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही. ज्ञानार्जनाबरोबरच संस्कारक्षम नागरिक म्हणून त्यांची जडणघडण होणे आवश्यक आहे. मात्र फार थोड्या शाळांमध्ये अशाप्रकारचे शिक्षण दिले जाते. केवळ पुस्तकामध्ये दिलेल्या मजकुराची घोकंपट्टी करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील उपजत गुणांना व्यासपीठच मिळत नाही. न्यू इंग्लिश स्कूलने मात्र नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कंबर कसली आहे. शाळेमध्ये यावर्षी ‘अहम भारत’ हा उपक्रम राबविला जात आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनविण्याचे धडे दिले जातात. ‘मी म्हणजेच भारत’ अशी भावना त्यांच्यात निर्माण केली जात आहे. स्वच्छतेपासून वाहतूक नियमांची माहिती देण्यापर्यंत विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी परमवीर चक्र, भारतरत्न मिळालेल्यांची माहिती, त्यावर व्याख्यान, पोस्टर्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी दिली.प्रत्येक भाषा विषयासह इतर विषयांची विद्यार्थ्यांना गोडी लागण्यासाठीही दर आठवडा व महिन्याचा एक दिवस निश्चित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयाचे मंडळ शाळेत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची गोडी वाढविण्यासाठी दर पंधरा दिवसांनी समाजसेवा शिबीर घेतले जाते. मागील वर्षी रात्रशाळा भरवून विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव देण्यात आला होता. प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. त्यामध्ये सर्व शिक्षकही उत्स्फुर्तपणे भाग घेतात. विद्यार्थ्यांपर्यंत आगळ््यावेगळ््या पद्धतीने ज्ञान पोहचवून त्यांची बौध्दिक क्षमता वाढविणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे, हा त्यामागचा उद्देश आहे.- नागेश मोने, मुख्याध्यापक, न्यु इंग्लिश स्कूल, पुणे