शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

गीतरामायण शिवधनुष्य पेलण्यासारखे

By admin | Updated: March 17, 2015 00:30 IST

गीतरामायण’ गाणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असून, त्याचे गायन करणे ही सहजसोपी गोष्ट नाही, असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे : ‘गीतरामायण’ गाणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असून, त्याचे गायन करणे ही सहजसोपी गोष्ट नाही, असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सोमवारी व्यक्त केले. सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर आणि प्रतिभावंत संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर सांगीतिक निर्मिती म्हणजे ‘गीतरामायण.’ पुणे आकाशवाणीवरून साठ वर्षांपूर्वी प्रसारित झालेले गीतरामायण मराठी सांस्कृतिक विश्वाचा मानबिंदू ठरले आहे. या गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधून नव्या पिढीतील गायक-गायिकांनी या निर्मितीचा आस्वाद घ्यावा यासाठी गदिमा प्रतिष्ठान व स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने गीतरामायण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील निवडक ११ स्पर्धकांची अंतिम फेरी निवारा सभागृहात झाली. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी श्रीधर फडके बोलत होते. गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर, कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर, स्वरानंदचे प्रकाश भोंडे उपस्थित होते. स्पर्धेत अमिता घुगरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शंतनू पानसे द्वितीय, तर स्वामिनी कुलकर्णी तृतीय आली. विजेत्यांना या वेळी पारितोषिके देण्यात आली. आजवर अनेक सुगमसंगीताच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मात्र, प्रथमच गीतरामायणासारख्या शास्त्रीय संगीतावर आधारित गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून फडके म्हणाले, ‘‘लय, बाज, भाव, स्वरांचा लगाव यांचे मिश्रण म्हणजे गीतरामायण. उत्तम कसं गावं, सादरीकरण कसं करावं, त्यात भावनिक ओलावा कसा आणावा याचे शिक्षण गीतरामायणातून मिळते. गीतरामायण हे अजरामर काव्य असल्याने पुढील अनेक पिढ्या याचे गायन करतील.’’ आनंद माडगूळकर म्हणाले, ‘‘गीतरामायणाला अनेक पदर असून, विविध भावनांच्या छटा त्यात अनुभवायला मिळतात. त्याचे आकलन करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. समर्पित भावनेने तल्लीनतेने ते सादर होणे आवश्यक आहे. गीतरामायणाची तयारी करताना त्यासाठी जास्तीतजास्त वेळ दिला गेला पाहिजे. चित्रपटातील गाणी किंवा भावगीत म्हणण्यासारखे ते सोपे नाही. आज नदीच्या मुखातून महासागरात प्रवेश करीत आहात, त्यातूनच गीतरामायणासारखी अनेक रत्नं तुमच्या हाती गवसणार आहेत.’’शैला मुळगंद यांनी सूत्रसंचालन केले, तर स्पर्धेचे समन्वयक आणि स्वरानंदचे विश्वस्त विजय मागीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पहिला गीतरामायणाचा कार्यक्रम४माझ्या आणि आनंदच्या मुंजीनिमित्त एखादा सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, अशी उपस्थितांची इच्छा होती. त्या वेळी बाबूजी यांचे गाणे आणि गदिमा यांच्या उत्कृष्ट निवेदनातून कार्यक्रम रंगत गेला. इतका की हा कार्यक्रम ऐकून शेजारची मंडळी, आसपासचे लोक घरच्या परिसरात जमा झाले. तब्बल १००० श्रोते उपस्थित होते. गीतरामायणाचा तो पहिला कार्यक्रम होता, अशा गीतरामायणाच्या आठवणींना श्रीधर माडगूळकर यांनी उजाळा दिला.