शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

गीतरामायण शिवधनुष्य पेलण्यासारखे

By admin | Updated: March 17, 2015 00:30 IST

गीतरामायण’ गाणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असून, त्याचे गायन करणे ही सहजसोपी गोष्ट नाही, असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे : ‘गीतरामायण’ गाणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे असून, त्याचे गायन करणे ही सहजसोपी गोष्ट नाही, असे मत ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सोमवारी व्यक्त केले. सिद्धहस्त कवी ग. दि. माडगूळकर आणि प्रतिभावंत संगीतकार सुधीर फडके यांची अजरामर सांगीतिक निर्मिती म्हणजे ‘गीतरामायण.’ पुणे आकाशवाणीवरून साठ वर्षांपूर्वी प्रसारित झालेले गीतरामायण मराठी सांस्कृतिक विश्वाचा मानबिंदू ठरले आहे. या गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवाचे औचित्य साधून नव्या पिढीतील गायक-गायिकांनी या निर्मितीचा आस्वाद घ्यावा यासाठी गदिमा प्रतिष्ठान व स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने गीतरामायण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील निवडक ११ स्पर्धकांची अंतिम फेरी निवारा सभागृहात झाली. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी श्रीधर फडके बोलत होते. गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर, कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर, स्वरानंदचे प्रकाश भोंडे उपस्थित होते. स्पर्धेत अमिता घुगरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. शंतनू पानसे द्वितीय, तर स्वामिनी कुलकर्णी तृतीय आली. विजेत्यांना या वेळी पारितोषिके देण्यात आली. आजवर अनेक सुगमसंगीताच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मात्र, प्रथमच गीतरामायणासारख्या शास्त्रीय संगीतावर आधारित गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून फडके म्हणाले, ‘‘लय, बाज, भाव, स्वरांचा लगाव यांचे मिश्रण म्हणजे गीतरामायण. उत्तम कसं गावं, सादरीकरण कसं करावं, त्यात भावनिक ओलावा कसा आणावा याचे शिक्षण गीतरामायणातून मिळते. गीतरामायण हे अजरामर काव्य असल्याने पुढील अनेक पिढ्या याचे गायन करतील.’’ आनंद माडगूळकर म्हणाले, ‘‘गीतरामायणाला अनेक पदर असून, विविध भावनांच्या छटा त्यात अनुभवायला मिळतात. त्याचे आकलन करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. समर्पित भावनेने तल्लीनतेने ते सादर होणे आवश्यक आहे. गीतरामायणाची तयारी करताना त्यासाठी जास्तीतजास्त वेळ दिला गेला पाहिजे. चित्रपटातील गाणी किंवा भावगीत म्हणण्यासारखे ते सोपे नाही. आज नदीच्या मुखातून महासागरात प्रवेश करीत आहात, त्यातूनच गीतरामायणासारखी अनेक रत्नं तुमच्या हाती गवसणार आहेत.’’शैला मुळगंद यांनी सूत्रसंचालन केले, तर स्पर्धेचे समन्वयक आणि स्वरानंदचे विश्वस्त विजय मागीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पहिला गीतरामायणाचा कार्यक्रम४माझ्या आणि आनंदच्या मुंजीनिमित्त एखादा सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, अशी उपस्थितांची इच्छा होती. त्या वेळी बाबूजी यांचे गाणे आणि गदिमा यांच्या उत्कृष्ट निवेदनातून कार्यक्रम रंगत गेला. इतका की हा कार्यक्रम ऐकून शेजारची मंडळी, आसपासचे लोक घरच्या परिसरात जमा झाले. तब्बल १००० श्रोते उपस्थित होते. गीतरामायणाचा तो पहिला कार्यक्रम होता, अशा गीतरामायणाच्या आठवणींना श्रीधर माडगूळकर यांनी उजाळा दिला.