शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गौरी गणपती विसर्जनाला वरुणराजाचीही हजेरी

By admin | Updated: September 4, 2014 23:24 IST

सुमारे 37 हजार 156 गणपतींसह सुमारे 34 हजार 1क्क् गौरींचे आज ठिकठिकाणी भक्तीभावे प्रदूषण विरहित उत्साहात व वरुणराजाने अधूनमधून लावलेल्या हजेरीत विसर्जन करण्यात आले.

जिल्ह्यात सात दिवसांपासून विराजमान झालेल्या सुमारे 37 हजार 156 गणपतींसह  सुमारे 34 हजार 1क्क् गौरींचे आज  ठिकठिकाणी भक्तीभावे प्रदूषण विरहित उत्साहात व वरुणराजाने अधूनमधून लावलेल्या हजेरीत विसर्जन करण्यात आले. ढोलताशाच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत या सात दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला दरम्यान सुदैवाने कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
ठाणो : तीन दिवांपूर्वी माहेरी आलेल्या 34 हजार 1क्क् गौरींचे विसर्जन गुरुवारी झाले. यापैकी 32 हजार 383 ठाणो पोलीस आयुक्तालय कक्षेतील आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  एक हजार 717 गौरींचे भक्तीभावे विसर्जन करण्यात आले आहेत. तर विसर्जन करण्यात आलेल्या सात दिवसांच्या 37 हजार 156 गणपतींमध्ये शहरी भागातील 35 हजार 213 गणपतींचा  समावेश होता. 
यात खाजगी 35 हजार 6क् गणपतीं असून सार्वजनीक 153 गणपतींचे ठाणो पोलीस आयुक्तालय क्षेत्रत विसर्जन करण्यात आले. याशिवाय पोलीस अधीक्षकांच्या ग्रामीण कार्यक्षेत्रत  एक हजार 942 गणपतींचे विसर्जन झाले आहे. 
 
कल्याणमध्ये नऊ हजार गणपती तर 28क्क् गौरींना भावपूर्ण निरोप
कल्याण डोंबिवली शहरातील सार्वजनिक मंडळांचे 57 आणि घरगुती 9 हजार 275 गणपतींचे तर 2 हजार 825 गौरींचे विसर्जन रेतीबंदर,गणोश घाट दुर्गाडी, गौरीपाडा, कचोरे, खोणी, आधारवाडी, गोविंदवाडी, जुनी डोंबिवली या ठिकाणच्या खाडी किनारी, तलाव, विहिरी, खदाण आदी ठिकाणी पार पडले. 
केडीएमसी आणि विविध सामाजिक संघटनानी डोंबिवलीतील नेहरू मैदान, प्रगती महाविद्यालय, भागशाळा मैदान, पंचायत बावडी तर कल्याणमधील खडेगोळवली येथे कृत्रिम तलावांची सोय केली होती. 
मात्र, नेमक्या विसर्जनवेळीच संध्याकाळी 7 वाजता वीज गेली. पुढील 5 तास वीज येणार नसल्याचे कळल्यानंतरही भाविकांच्या उत्साहावर कोणतेही विरजण पडले नाही. विसर्जनाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने गणोशभक्तांची तारांबळ उडाली. अनेकांना रिक्षा किंवा गाडीतच आरती केली. 
 
शहापूरमध्ये विसर्जन : उत्साहात आगमन झालेल्या सात दिवसांच्या गणरायाला गुरूवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. किन्हवली, अघई, वासिंद, कसारा, डोळखांब, नडगांव, खर्डी, भातसानगर, शेणवे भागातील मिळून घरगुती 6क्क् व विविध गणोश मंडळांच्या 2क् गणपतींना निरोप देण्यात आला. शहापूर शहरातील गणपतींचे सापगांव येथील भातसा नदीत विसर्जन झाले. प्रस्तावित गणोशघाटाचे बांधकाम यंदाही रखडल्याने विसर्जनाच्या वेळी गणोशभक्तांची गैरसोय झाली. 
 
गौराईसोबत बाप्पाला निरोप : टिटवाळा शहरासह ग्रामीण भागात गौराईसोबत सात दिवसांच्या बाप्पांना जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी 137क् गणपती बाप्पा व 398 गौरींचे विसजर्न करण्यात आले. टिटवाळा येथील हनुमान मंदिर, वासुंद्री व गुरवली काळूनदी घाट, खडवली भातसा नदी घाट, पाचवा मैल उल्हास नदीघाट तसेच फळेगांव, उशिद, उतने, राया, दानबाव, म्हस्कल, घोटसई, नांदप आदी ठिकाणच्या बाप्पांना गावालगत असणा:या नाले, हौद व डोहात गौराईसोबत मोठय़ा जड अंत:करणाने साश्रू नयनांनी विसजर्न करण्यात आले.
 
वाडय़ात भावपूर्ण विसजर्न
वाडा : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, या जयघोषांनी वाडय़ात बँजोची साथ, गुलालाची उधळण करीत गणपती व गौरीला निरोप देण्यात आला. विसजर्नास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाडा-भिवंडी महामार्ग बंद ठेवण्यात आला. या मार्गाची वाहतूक अंबाडी -दाभाडी पाईपलाईन मार्गे वळविण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
मीरा-भाईंदरमध्ये श्रींचे विसर्जन 
4मीरा-भाईंदरमध्ये सात दिवसांच्या सुमारे 9 हजार गणोश मूर्तीचे विसर्जन गौराईसह मोठय़ा भक्तीभावाने करण्यात आले. 
4पालिकेने यंदाच्या गणोश विसर्जनासाठी चोख व्यवस्थेसह एकुण 22 ठिकाणी  विसर्जनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. यंदा कृत्रिम तलावाला प्रशासनाने लाल दिवा दाखविल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे. 
4पालिकेसह पोलिस यंत्रणोने आपापले कर्मचारी बाप्पांच्या शिरगणतीसाठी नियुक्त केले असून दरवर्षी वाढणा:या बाप्पांच्या संख्येत यंदाही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. गतवर्षीपेक्षा शहरात यंदाच्या दिड, पाच व सात दिवसांच्या विसर्जनात 4क् टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
विसजर्न मिरवणूक
खड्डय़ांतून
मुंब्रा:गणोश उत्सवा दरम्यान वेळोवेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्यातील प्रमुख रस्त्यावरील काही भागां मध्ये पडलेल्या खड्ड्याची डागडुजी करण्यात न आल्या मुळे येथील  विविध भागां मधील  बाप्पा तसेच बहुतांशी गौरी ना देखील खड्डय़ांमधून डुगडुगत भक्तांचा निरोप घ्यावा लागला. दरम्यान गुरूवारी येथील नारायण नगर,रेतीबंदर,पाटील वाडी येथील खाडी किनारे याच प्रमाणो मुंब्रेश्वर मंदिरा जवळील तलाव आदी ठिकाणी येथील गौरी -गणपतीना रात्री उशिरा र्पयत पुढील वषीँ लवकर याच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला.