शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

तेलंगणातील मराठमोळे IPS अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेत गौरव

By admin | Updated: June 29, 2017 15:22 IST

तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं बहुसन्मान केला आहे. अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड’ देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 29 - तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं बहुसन्मान केला आहे.  अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड’ देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे.  महेश भागवत आता हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. 
 
महेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात त्यांनी व त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केलेत. 
 
यावेळी तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसंच सिंगापूर येथील केंद्रावरही महेश भागवत आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली आहे. ही कारवाई करताना भागवत अडथळ्यांना, विरोधकांना, जीवघेण्या धमक्यांना घाबरले नाहीत. आपले कार्य सुरू ठेवत त्यांनी पीडितांना वाचवले, आरोपींना शासन केलं आणि जगजागृती करण्याचे आपले काम कायम सुरू ठेवले. 
 
मानवी तस्कराविरोधात लढा देणा-या महेश भागवत यांनी आतापर्यंत शेकडो  पीडितांची अन्य सरकारी विभाग आणि नागरी संस्थांच्या मदतीनं सुखरुप सुटका केली आहे. एवढंच नाही तर त्यांचे योग्य पद्धतीनं पुनर्वसन होईल याची काळजीही घेतली. 
 
अमेरिककडून करण्यात आलेल्या बहुसन्मानाबाबत बोलताना महेश भागवत म्हणाले की, ""गेली तेरा वर्षे अँटी ट्रफिकिंग मोहिमेमध्ये मी काम करत आहे, त्या कामाबद्दल 27 तारखेस अमेरिकेत पुरस्कार दिला गेला. या तेरा वर्षांमध्ये सध्याच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातील आमच्या चमुने शेकडो बालमजुरांची सुटका केली. तसेच अनेक वेश्यागृहेदेखील बंद केली. तसेच यासंदर्भात तेलंगणमधील ट्रॅफिकिंगशी संबंध आलेल्या पुणे, बंगळुरु, दिल्ली व सिंगापूर येथील केंद्रावरही आम्ही कारवाई केली. मानव तस्करीविरोधातील या कार्याला मिळालेला हा पुरस्कार आमचा हुरुप वाढवणारा असून या कामाला जागतिक मान्यता मिळाली असे मला वाटते. या विषयावर मी लिहिलेली पुस्तके भारत सरकारचे गृह मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रतरफे प्रसिद्धही झाले आहे"".
 
महेश भागवत हे महाराष्ट्रातील मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.  गेल्या 13 वर्षापासून ते मानवी तस्करीविरोधात कार्य करत आहेत.