शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

यात्रांमध्ये गजबजले कुस्त्यांचे आखाडे!

By admin | Updated: May 4, 2017 02:15 IST

पुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा हंगाम उत्साहात पार पडला असून बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असली तरी गावोगावी यात्रा कमिट्यांनी कुस्त्यांचे

तुषार मोढवे / चासकमानपुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा हंगाम उत्साहात पार पडला असून बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असली तरी गावोगावी यात्रा कमिट्यांनी कुस्त्यांचे आखाडे भरवून यात्रांमध्ये रंगत आणली! बैलगाडाशौकिनांनीही दुधाची तहान ताकावर भागवत कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी आखाड्यांमध्ये गर्दी केली. दिवाळी संपली, की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये यात्रांचा हंगाम सुरू होतो तो अगदी वैशाख शुद्ध द्वितीयापर्यंत चालू राहतो. या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये परंपरेनुसार आपल्या ग्रामदैवताची यात्रा उत्साहात साजरी केली जाते. यात्रेनिमित्त शहरांमध्ये गेलेले चाकरमानी आवर्जून कुटुंबासह गावी येतात, ग्रामदैवत, कुलदैवताचे दर्शन घेतात आणि पारंपरिक यात्रा उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. यात्रा म्हटलं, की बैलगाड्यांच्या शर्यती, भारुड, तमाशा यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आणि पुन्हा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे साधारण उत्सवाचे स्वरूप असते. यात्रेनिमित्त पाहुण्यांना, मित्रमंडळींना आवर्जून स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले जाते. गावांमधील बैलगाडाशौकीन दिवसभर घाटामध्ये शर्यती पाहायच्या आणि पाहुण्यांच्या घरी जाऊन भोजन करायचे, वेळ असला तर रात्री भारुड किंवा तमाशा पाहायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या गावी जायचे असा पूर्वीचा कार्यक्रम असे. परंतु आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद असल्याने गावोगावच्या यात्रांची गर्दी कमी झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी बैलांची गावातून मिरवणूक काढून ग्रामदैवताची पालखी काढणे व हारतुरे करणे एवढेच काम राहिले आहे. मात्र बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या तरी यात्रा आयोजकांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. नुकताच कुस्ती या खेळावरील आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट येऊन गेल्याने ग्रामीण भागात पुन्हा कुस्तीचे पर्व सुरू झाले आहे. यात्रांमध्ये आखाड्यामध्ये आता गावोगावच्या प्रसिद्ध मल्लांना आमंत्रित करून त्यांच्या निकाली कुस्त्या लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसेही ठेवण्यात येत आहेत. राज्यपातळी, देशपातळीवरील विविध कुस्ती स्पर्धांमधील विजेत्या, उपविजेत्या मल्लांना आमंत्रित करून त्यांचीही कुस्ती खेळवली जात आहे. त्यामुळे कुस्तीशौकिनांची संख्या वाढली.कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, अहमदनगर या जिल्ह्यांमधून नामांकित मल्ल मोठ्या गावांच्या यात्रांमध्ये हजेरी लावू लागले आहेत. त्यामुळे लहान मुले व युवकांमध्येही कुस्तीच्या खेळाबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे.अनेक गावांमधून पालक आपल्या मुलांना एक-दोन महिने कोल्हापूरच्या तालमींमध्ये पाठवू लागले आहेत. ग्रामीण भागामध्ये हळूहळू लोप पावत चाललेल्या या खेळाला यात्रांमध्ये मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पुन्हा जीवदान मिळाले आहे.