शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

माळ दानवेंच्याच गळ्यात

By admin | Updated: January 17, 2016 02:31 IST

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाची माळ विद्यमान अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याच गळ्यात पडेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या महिनाच्या अखेरीस या बाबतची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाची माळ विद्यमान अध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याच गळ्यात पडेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या महिनाच्या अखेरीस या बाबतची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. दानवे हे केंद्रात मंत्री असताना त्यांना तेथून प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. ते जालन्याचे खासदार असून मराठा समाजाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन्ही बड्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. सूत्रांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्षपद होऊ शकतील अशांपैकी विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्ष व्हावे, अशी पक्षाचीही इच्छा नाही. एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या सूत्रानुसार मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष एकाच व्यक्तीला दिले जाणार नाही. मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्ष होण्याची कोणाची इच्छादेखील दिसत नाही. दानवे हे उद्या रविवारी दिल्लीला जात असून काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या वर्षभरातील निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले नाही त्यामुळे दानवे यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, असा तर्क दिला जात असला तरी भाजपाला सत्ता मिळाली नाही पण संख्याबळ मात्र वाढल्याने हा तर्क लागू होत नाही, असे काहींचे म्हणणे आहे.तसेच, विजयाचे श्रेय आणि पराजयाचे अपश्रेय हे सामूहिक असते अशी भूमिका आमच्या पक्षाने नेहमीच घेतली आहे, असे भाजपाच्या एक ज्येष्ठ नेते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)आधी जिल्हाध्यक्षांची निवड- भाजपाचे जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती २० जानेवारीपर्यंत चालेल. ८० टक्के जिल्हाध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेता येते. त्यानुसार जिल्हाध्यक्ष आणि प्रत्येक विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले राज्य परिषद सदस्य यांची बैठक मुंबईत होईल आणि तीत प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल.आतापर्यंतच्या परंपरेनुसार ही बैठक एक औपचारिकता असते. श्रेष्ठींकडून सूचित केलेल्या नावाची सर्वांनाच कल्पना असते आणि त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.