शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गंगेचे पाणी यमुना, नर्मदेपेक्षा स्वच्छ

By admin | Updated: January 4, 2017 23:47 IST

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे पाणी पुराणांपासून पवित्र मानण्यात येते.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 4 - कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे पाणी पुराणांपासून पवित्र मानण्यात येते. वैज्ञानिकदृष्ट्यादेखील समोर आलेले निष्कर्ष काहीसे असेच आहेत. गंगेच्या पाण्यातील प्रदूषणाचा अभ्यास नीरीतर्फे करण्यात आला. यात नर्मदा व यमुना या नद्यांपेक्षा गंगा नदीचे पाणी जास्त स्वच्छ असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे गंगेच्या संपूर्ण प्रवाहात प्रदूषित पाणणी मिसळत असले तरी प्रत्यक्षात पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत नसल्याचेदेखील वैज्ञानिकांना आढळून आले आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांनी हा खुलासा केला आहे.विज्ञान भारतीतर्फे बुधवारी सायंकाळी सायंटिफिक सभागृहात आयोजित गंगेची रोगनिवारण शक्ती- वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. गंगा नदीसोबतच नर्मदा व यमुना नदीचा विविध ठिकाणी जाऊन नीरीच्या पथकाने अभ्यास केला. कानपूर, वाराणसी, पटना येथे गंगा नदी सर्वात जास्त प्रदूषित आहे. मात्र तरीदेखील पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण फारसे कमी होत नाही. रात्रीदेखील हे प्रमाण नियंत्रित असते. हे नेमके कशामुळे होते, हा वेगळ््या संशोधनाचाच विषय आहे. याशिवाय गंगा नदीत बॅक्टेरियोफेज हे विशिष्ट विषाणू आढळून येतात. त्यांच्यामुळे पाणी स्वच्छ राहते. यमुना व नर्मदेपेक्षा हे प्रमाण गंगेत खूप जास्त आहे. गंगेत वैज्ञानिकांनी बाहेरून जीवाणू टाकले. मात्र बॅक्टेरियोफेजच्या प्रभावामुळे त्यांची वाढ झाली नाही. त्यामुळेच गंगेच्या स्वच्छ पाणी जास्त दिवस साठवून ठेवले असतानादेखील त्याला दुर्गंध येत नाही, असे डॉ. राकेशकुमार यांनी सांगितले.गंगेच्या पाण्यात प्राणवायूचे प्रमाण नियंत्रित असले तरी ई-कोलायचे प्रमाण वाढीस लागत आहे व ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. गंगेत विविध नाल्यांचे पाणीदेखील मोठ्या प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण वाढते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अ‍ॅग्रोकेमिकल गंगेसाठी घातकगंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते. ही जमीन सुपिकच असते. मात्र तरीदेखील अ‍ॅग्रोकेमिकल वापरण्यात येतात. केमिकल्सयुक्त खतांमुळे गंगेसोबतच सर्व नद्या सर्वात जास्त प्रभावित होत आहेत. नद्यांमधील प्रदूषणासाठी धरणे व बांधदेखील काही प्रमाणात कारणीभूत आहे. नद्यांचे पाणी अविरल कसे वाहत राहील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय सेंद्रिय शेतीचादेखील जास्तीत जास्त उपयोग व्हायला हवा, असे डॉ. राकेशकुमार म्हणाले.नद्यांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र मागेनद्यांचे पाणी स्वच्छ ठेवण्यात विविध जीवाणू व विषाणूंचा मोठा सहभाग असतो. मात्र त्यांना योग्य प्रमाणात प्राणवायूची आवश्यकता असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण ह्यबीओडीह्णने (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) मापतात. बीओडीवरून नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता ठरते. यादृष्टीने मोजमाप केले असता महाराष्ट्रातील नद्या गुणवत्तेत सर्वात मागे आहेत. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील नद्यांचा महाराष्ट्रापाठोपाठ क्रमांक लागतो.