शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

गणेशोत्सवात एसटी सेवा कोलमडणार ?

By admin | Updated: June 9, 2014 03:21 IST

एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत

मुंबई : एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. निकाल १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडून नुकतीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र भरती होणाऱ्या चालकांना प्रत्यक्षात कामावर रुजू होण्यास साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबई विभागाचा बोऱ्या तर वाजणार नाही ना, अशी चिंता एसटीच्या कार्यरत चालकांना लागून राहिली आहे. एसटी महामंडळाने मुंबई विभागासाठी कनिष्ठ चालकांबरोबरच राज्यातील अधिकारी (तांत्रिक आणि अतांत्रिक) आणि पर्यवेक्षकीय पदासाठी ९ आणि २३ मार्चला परीक्षा घेतली. यात ६ हजार ५७५ विविध पदांसाठी १ लाख ५५ हजार १६३ उमेदवारच पात्र ठरले आणि त्यांनी परीक्षा दिली. महत्त्वाची बाब म्हणजे यात मुंबई विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २ हजार ८७६ कनिष्ठ चालकांची पदे भरली जाणार आहेत. मुंबई विभागात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाचा समावेश असून, यांना चालकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र असे असतानाही नुकताच प्रथम अवघे ११९ पदे असलेल्या एसटीतील अधिकाऱ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि आता त्यांच्या मुलाखतीचीही तयारी केली जात आहे. पण यात मोठ्या संख्येने असलेल्या चालकांचा निकाल लागण्यास एसटीकडून विलंब होत आहे. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी चालकांचा निकाल १५ दिवसांत लावू असे आश्वासन दिले. मात्र हा निकाल जाहीर केल्यानंतर या चालकांना कामावर रुजू होण्यास साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या चालकांचा निकाल लागल्यावर त्यांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल. चालकांची संख्या मोठी असल्याने ही चाचणी साधारण १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालेल. ती पुण्यातील भोसरी येथील अत्याधुनिक ड्रायव्हिंग ट्रॅकवर घेतली जाईल. त्यानंतर चालकांनी दिलेल्या लेखी परीक्षेचे आणि या ड्रायव्हिंग चाचणीचे गुणांकन एकत्र करून त्याची यादी तयार केली जाईल. प्रत्येक विभागानुसार त्यांना बोलावले जाईल आणि त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.