शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात एसटी सेवा कोलमडणार ?

By admin | Updated: June 9, 2014 03:21 IST

एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत

मुंबई : एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. निकाल १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडून नुकतीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र भरती होणाऱ्या चालकांना प्रत्यक्षात कामावर रुजू होण्यास साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबई विभागाचा बोऱ्या तर वाजणार नाही ना, अशी चिंता एसटीच्या कार्यरत चालकांना लागून राहिली आहे. एसटी महामंडळाने मुंबई विभागासाठी कनिष्ठ चालकांबरोबरच राज्यातील अधिकारी (तांत्रिक आणि अतांत्रिक) आणि पर्यवेक्षकीय पदासाठी ९ आणि २३ मार्चला परीक्षा घेतली. यात ६ हजार ५७५ विविध पदांसाठी १ लाख ५५ हजार १६३ उमेदवारच पात्र ठरले आणि त्यांनी परीक्षा दिली. महत्त्वाची बाब म्हणजे यात मुंबई विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २ हजार ८७६ कनिष्ठ चालकांची पदे भरली जाणार आहेत. मुंबई विभागात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाचा समावेश असून, यांना चालकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र असे असतानाही नुकताच प्रथम अवघे ११९ पदे असलेल्या एसटीतील अधिकाऱ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि आता त्यांच्या मुलाखतीचीही तयारी केली जात आहे. पण यात मोठ्या संख्येने असलेल्या चालकांचा निकाल लागण्यास एसटीकडून विलंब होत आहे. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी चालकांचा निकाल १५ दिवसांत लावू असे आश्वासन दिले. मात्र हा निकाल जाहीर केल्यानंतर या चालकांना कामावर रुजू होण्यास साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या चालकांचा निकाल लागल्यावर त्यांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल. चालकांची संख्या मोठी असल्याने ही चाचणी साधारण १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालेल. ती पुण्यातील भोसरी येथील अत्याधुनिक ड्रायव्हिंग ट्रॅकवर घेतली जाईल. त्यानंतर चालकांनी दिलेल्या लेखी परीक्षेचे आणि या ड्रायव्हिंग चाचणीचे गुणांकन एकत्र करून त्याची यादी तयार केली जाईल. प्रत्येक विभागानुसार त्यांना बोलावले जाईल आणि त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.