शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

गणेशोत्सवात एसटी सेवा कोलमडणार ?

By admin | Updated: June 9, 2014 03:21 IST

एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत

मुंबई : एसटी महामंडळाला मुंबई विभागात मोठ्या संख्येने चालकांची गरज असूनही त्याचा निकाल लावण्यावरून एसटी महामंडळाकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. निकाल १५ दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांकडून नुकतीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. मात्र भरती होणाऱ्या चालकांना प्रत्यक्षात कामावर रुजू होण्यास साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबई विभागाचा बोऱ्या तर वाजणार नाही ना, अशी चिंता एसटीच्या कार्यरत चालकांना लागून राहिली आहे. एसटी महामंडळाने मुंबई विभागासाठी कनिष्ठ चालकांबरोबरच राज्यातील अधिकारी (तांत्रिक आणि अतांत्रिक) आणि पर्यवेक्षकीय पदासाठी ९ आणि २३ मार्चला परीक्षा घेतली. यात ६ हजार ५७५ विविध पदांसाठी १ लाख ५५ हजार १६३ उमेदवारच पात्र ठरले आणि त्यांनी परीक्षा दिली. महत्त्वाची बाब म्हणजे यात मुंबई विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत २ हजार ८७६ कनिष्ठ चालकांची पदे भरली जाणार आहेत. मुंबई विभागात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाचा समावेश असून, यांना चालकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र असे असतानाही नुकताच प्रथम अवघे ११९ पदे असलेल्या एसटीतील अधिकाऱ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि आता त्यांच्या मुलाखतीचीही तयारी केली जात आहे. पण यात मोठ्या संख्येने असलेल्या चालकांचा निकाल लागण्यास एसटीकडून विलंब होत आहे. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी चालकांचा निकाल १५ दिवसांत लावू असे आश्वासन दिले. मात्र हा निकाल जाहीर केल्यानंतर या चालकांना कामावर रुजू होण्यास साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. या चालकांचा निकाल लागल्यावर त्यांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल. चालकांची संख्या मोठी असल्याने ही चाचणी साधारण १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालेल. ती पुण्यातील भोसरी येथील अत्याधुनिक ड्रायव्हिंग ट्रॅकवर घेतली जाईल. त्यानंतर चालकांनी दिलेल्या लेखी परीक्षेचे आणि या ड्रायव्हिंग चाचणीचे गुणांकन एकत्र करून त्याची यादी तयार केली जाईल. प्रत्येक विभागानुसार त्यांना बोलावले जाईल आणि त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.