शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

गांधी वाडा : प्रशस्त मंडपाची उभारणी; दर्शनबारीचा दर्शनी भाग मुक्कामासाठी उपलब्ध

By admin | Updated: June 28, 2016 01:35 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे उद्या (मंगळवारी) दिमाखात प्रस्थान होणार आहे.

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे उद्या (मंगळवारी) दिमाखात प्रस्थान होणार आहे. या प्रस्थानानंतरचा पहिला मुक्काम असलेले आजोळघर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. देवस्थानच्या वतीने आजोळघराच्या जागी असलेला जुना वाडा, ज्याला गांधीवाडा असे म्हणत तो पाडून त्या जागी प्रशस्त असा सभामंडप व दर्शनबारी उभारण्यात आली आहे. याच दर्शनबारीचा दर्शनी भाग मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रशस्त जागेत वाड्यातील जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे छोटे मंदिर उभारले आहे. या मंदिरासमोरच पालखी मुक्कामासाठी ठेवली जाणार आहे. भक्तांचे योग्य नियोजन होऊन सर्वांना पालखीचे दर्शन घेता येईल, अशी सोय देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. पावसाचा त्रास मुक्कामाच्या ठिकाणी होऊ नये याकरिता लोखंडी पत्रे वापरून आजोळघरासमोर प्रशस्त मंडप उभारला आहे. आजोळघराच्या चारही बाजूंनी प्रकाशव्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंडप सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे.पोलिसांच्या वतीनेदेखील मुक्कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्तांना सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. गतवर्षी येथील मुक्कामच्या जागेवरून बरेच आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यासाठी पालखी प्रस्थानासाठी उशीरही झाला होता. त्या आक्षेपांची दखल घेऊन यंदा देवस्थानकडून येथील बांधकामात काही बदल करण्यात आले आहे.>पालखी प्रस्थानानंतर ती आजोळघरी मुक्कामाला राहते ही परंपरागत चालत आलेली प्रथा असून, हे आजोळघर म्हणजे संत ज्ञानेश्वरमहाराज व त्यांच्या भावंडांचे आजोळ आहे. पूर्वी माऊली वारीला निघत तेव्हा पहिला मुक्काम आपल्या आजोळी श्रीयुत गांधी यांच्याकडे करत म्हणून तीच प्रथा पुढे पालखी सोहळ्यात रुजू झाल्याचे भक्त सांगत असतात. कालांतराने येथील जुना मातीचा दगडी वाडा ज्याची ओळख गांधीवाडा अशी होती, तो दर्शनबारी व इतर कारणांसाठी पाडावा लागला, तरी येथील रूढ झालेली मुक्कामाची परंपरा विनाखंड सुरूआहे. आजही भक्तांची ओढ पालखी प्रस्थान झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी आजोळघराकडे लागलेली असते. यंदाही पालखी प्रस्थान झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा घालून आजोळघरी स्थिरावणार आहे.त्यानंतर समाज आरती होऊन दिंड्याही आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी जातील. भक्तांना दर्शन खुले केल्यानंतर जागर होऊन पहाटे माऊली पंढपूरसाठी प्रस्थान ठेवतील आणि आजोळघर पुन्हा माऊलींचा वर्षभराचा दुरावा घेऊन रिकामे होईल.

 

आळंदी : माऊलींच्या पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचे मानाचे अश्व कर्नाटकातील अंकलीहून आळंदीत शाही लवाजम्यासह सोमवारी (दि. २७) पुण्याहून निघाल्यानंतर इंद्रायणी नदीलगतच्या हरप्रीतसिंह सरदार बिडकर यांच्या वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात अश्वपूजा आणि पाहुणचार घेऊन आळंदीत दाखल झाले. प्रथा-परंपरांचे पालन करीत अश्व आळंदीसमीप आल्याचा सांगावा आळंदी मंदिरात आल्यानंतर श्री गुरू हैबतरावबाबा यांचे दिंडीने हरिनाम गजरात जाऊन स्वागत केले. पूजा, प्रसाद, नैवेद्य, स्वागत झाल्यानंतर श्रींचे वैभवी अश्व अलंकापुरीत प्रवेशले. या प्रसंगी श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरदार, बाबाराजे शितोळे सरदार,अश्व चोपदार तुकाराम कोळी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, विकास ढगे पाटील, अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब आणि उद्धव चोपदार, जनहितचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, पृथ्वीराज बावीकर, उमेश बिडकर, रवीकुमार बिडकर, स्वामी सुभाषमहाराज, संतोष साबळे, शंकर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. अश्वांच्या दर्शनास भाविक व नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून दर्शन घेतले. माऊली मंदिरात अश्व प्रदक्षिणा, पूजा झाल्यानंतर फुलवाले धर्मशाळेत मुक्कामास मार्गस्थ झाले.