शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गांधी वाडा : प्रशस्त मंडपाची उभारणी; दर्शनबारीचा दर्शनी भाग मुक्कामासाठी उपलब्ध

By admin | Updated: June 28, 2016 01:35 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे उद्या (मंगळवारी) दिमाखात प्रस्थान होणार आहे.

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे उद्या (मंगळवारी) दिमाखात प्रस्थान होणार आहे. या प्रस्थानानंतरचा पहिला मुक्काम असलेले आजोळघर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. देवस्थानच्या वतीने आजोळघराच्या जागी असलेला जुना वाडा, ज्याला गांधीवाडा असे म्हणत तो पाडून त्या जागी प्रशस्त असा सभामंडप व दर्शनबारी उभारण्यात आली आहे. याच दर्शनबारीचा दर्शनी भाग मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रशस्त जागेत वाड्यातील जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे छोटे मंदिर उभारले आहे. या मंदिरासमोरच पालखी मुक्कामासाठी ठेवली जाणार आहे. भक्तांचे योग्य नियोजन होऊन सर्वांना पालखीचे दर्शन घेता येईल, अशी सोय देवस्थानतर्फे करण्यात आली आहे. पावसाचा त्रास मुक्कामाच्या ठिकाणी होऊ नये याकरिता लोखंडी पत्रे वापरून आजोळघरासमोर प्रशस्त मंडप उभारला आहे. आजोळघराच्या चारही बाजूंनी प्रकाशव्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण मंडप सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे.पोलिसांच्या वतीनेदेखील मुक्कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्तांना सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. गतवर्षी येथील मुक्कामच्या जागेवरून बरेच आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यासाठी पालखी प्रस्थानासाठी उशीरही झाला होता. त्या आक्षेपांची दखल घेऊन यंदा देवस्थानकडून येथील बांधकामात काही बदल करण्यात आले आहे.>पालखी प्रस्थानानंतर ती आजोळघरी मुक्कामाला राहते ही परंपरागत चालत आलेली प्रथा असून, हे आजोळघर म्हणजे संत ज्ञानेश्वरमहाराज व त्यांच्या भावंडांचे आजोळ आहे. पूर्वी माऊली वारीला निघत तेव्हा पहिला मुक्काम आपल्या आजोळी श्रीयुत गांधी यांच्याकडे करत म्हणून तीच प्रथा पुढे पालखी सोहळ्यात रुजू झाल्याचे भक्त सांगत असतात. कालांतराने येथील जुना मातीचा दगडी वाडा ज्याची ओळख गांधीवाडा अशी होती, तो दर्शनबारी व इतर कारणांसाठी पाडावा लागला, तरी येथील रूढ झालेली मुक्कामाची परंपरा विनाखंड सुरूआहे. आजही भक्तांची ओढ पालखी प्रस्थान झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी आजोळघराकडे लागलेली असते. यंदाही पालखी प्रस्थान झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा घालून आजोळघरी स्थिरावणार आहे.त्यानंतर समाज आरती होऊन दिंड्याही आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी जातील. भक्तांना दर्शन खुले केल्यानंतर जागर होऊन पहाटे माऊली पंढपूरसाठी प्रस्थान ठेवतील आणि आजोळघर पुन्हा माऊलींचा वर्षभराचा दुरावा घेऊन रिकामे होईल.

 

आळंदी : माऊलींच्या पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचे मानाचे अश्व कर्नाटकातील अंकलीहून आळंदीत शाही लवाजम्यासह सोमवारी (दि. २७) पुण्याहून निघाल्यानंतर इंद्रायणी नदीलगतच्या हरप्रीतसिंह सरदार बिडकर यांच्या वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात अश्वपूजा आणि पाहुणचार घेऊन आळंदीत दाखल झाले. प्रथा-परंपरांचे पालन करीत अश्व आळंदीसमीप आल्याचा सांगावा आळंदी मंदिरात आल्यानंतर श्री गुरू हैबतरावबाबा यांचे दिंडीने हरिनाम गजरात जाऊन स्वागत केले. पूजा, प्रसाद, नैवेद्य, स्वागत झाल्यानंतर श्रींचे वैभवी अश्व अलंकापुरीत प्रवेशले. या प्रसंगी श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरदार, बाबाराजे शितोळे सरदार,अश्व चोपदार तुकाराम कोळी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, विकास ढगे पाटील, अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब आणि उद्धव चोपदार, जनहितचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, पृथ्वीराज बावीकर, उमेश बिडकर, रवीकुमार बिडकर, स्वामी सुभाषमहाराज, संतोष साबळे, शंकर लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. अश्वांच्या दर्शनास भाविक व नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून दर्शन घेतले. माऊली मंदिरात अश्व प्रदक्षिणा, पूजा झाल्यानंतर फुलवाले धर्मशाळेत मुक्कामास मार्गस्थ झाले.