शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गांधी विचारांची हत्या होऊच शकत नाही

By admin | Updated: September 2, 2015 23:50 IST

गांधी स्मारक समितीचे सचिव राजन अन्वर यांच्याशी संवाद.

बुलडाणा :महात्मा गांधी हे केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हे, तर विचाराचे नाव आहे. त्यांचा विचार सर्वकालीन आहे. त्यांची हत्या झाली, मात्र त्यांच्या विचारांची हत्या करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते शक्य नाही. गांधी विचारांमध्ये प्रत्येक समस्येवर उपाय आहे. आजच्या राज्यकर्त्यांची वैचारिक धारणा काहीही असली, तरी त्यांना शांतता व विकासासाठी गांधी विचारांचाच आधार घ्यावा लागतो, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, असा विश्‍वास प्रख्यात गांधीवादी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव राजन अन्वर यांनी व्यक्त केला. ते बुधवारी बुलडाण्यात आले असता, त्यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.प्रश्न : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे काम कसे चालते ?महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा आणि तशी कृती व्हावी, यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ गांधीवादी बाळासाहेब भारदे या संस्थेचे अध्यक्ष होते. या संस्थेमार्फत गांधी अध्ययन केंद्र व गांधी विचार केंद्र अशा दोन केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात गांधी विचारांचा प्रसार करण्याचे काम गावोगावी केले जात आहे. प्रश्न : या केंद्रांमधून कोणते उपक्रम राबविले जातात ?गांधी अध्ययन केंद्राच्या माध्यमातून गांधी विचारांची वाचनालये, चर्चासत्र, शिबिरे घेतली जातात, तर ग्रामविकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता, शौचालय निर्मिती आणि वापर, यासोबतच ग्रामीण युवकांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबिरे व प्रबोधन शिबीरे घेतली जातात. राज्यस्तरावरही अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. विशेषत: गांधी सप्ताहात समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून होतो. प्रश्न : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडे किती जमीन आहे ?महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी तत्कालिन सीपी अँन्ड बेरारकडून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारी जमिनी मिळाल्या. या जमिनींवर ग्रामविकास समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे काम चालते. अनेक जिल्ह्यात या जमिनींचा ताबा खाजगी व्यक्तींनी अनधिकृतरित्या घेतला आहे. त्याचा शोध समितीने सुरू केला आहे. या जमिनी पुन्हा ताब्यात घेवून गांधी विचारांचा प्रसार केला जाईल.प्रश्न : तरूणांपर्यंत गांधी विचार पोहोचत नाहीत, याची काय कारणे असावीत ?आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कमी पडलो, हे खरे आहे. आताची माध्यमे बदलली. या माध्यमांचा वापर करण्यासाठी गांधी स्मारक निधीमार्फत प्रयत्न सुरू आहेत. सोशल मिडीया, विविध सिडी तसेच लघुकथांच्या माध्यमातून तरूणांना खरे गांधी विचार कळले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. प्रश्न : आताच्या काळात गांधी विचार कितपत संयुक्तीक वाटतात ?केवळ आताच्याच नव्हे तर भूतकाळ आणि भविष्यातही गांधी विचारांना मरण नाही. देशात सध्या एका वेगळ्या विचारांचे स्तोम माजविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे; मात्र तशी वैचारिक पातळी असलेल्या लोकांनाही शांततेसाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गांधीच लागतो. जगभरातील अनेक नेते नेल्सन मंडेला, बराक ओबामा किंवा अलिकडच्या काळात मलाला यांनीसुध्दा गांधी विचारांनाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ह्यगांधीह्ण कधीही मरणार नाही. प्रश्न : सोशल मिडीयावर गांधी विचारांचा अनेकदा विपर्यास दिसतो ?हो, हे खरे आहे. वैचारिक स्वातंत्र्य ही संकल्पना आपण मान्य केल्यामुळे प्रत्येकजण आपल्या मतांचे प्रदर्शन करतो. सोशल मिडीयावर गांधीव्देष हेच गृहीत मानून जे विपर्यास करतात त्यांनी खरा गांधी वाचलाच नाही. विचारांची लढाई ही विचारांनीच केली जाते. त्यामुळे कितीही अपप्रचार झाला तरी अशा विपर्यासाचे आयुष्य अल्पजीवी आहे.