शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

समान हक्काच्या मागणीमुळे गांधीजींची हत्या

By admin | Updated: January 23, 2017 03:07 IST

हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष होता. गांधीजी मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. तळागाळात असलेल्या दलितांना

पुणे : हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष होता. गांधीजी मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. तळागाळात असलेल्या दलितांना गांधीजींनी सामाजिकदृष्ट्या समानतेच्या पातळीवर आणून ठेवल्यानेही सवर्णांच्या मनात गांधींविषयी द्वेष होता. या दोन कारणांमुळे शिक्षा म्हणून गांधीजींची हत्या करण्यात आली, असे दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद झा यांनी रविवारी येथे सांगितले. हम समाजवादी संस्थाएं या संघटनेतर्फे राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयामध्ये अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोपापूर्वीच्या सत्रामध्ये झा बोलत होते. ‘गांधीजींचा अखेरचा महिना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीयवादाला सामावून घेणारा असावा. तसा तो नसला, तर संकुचित असेल तर तो पराभूत होतो. आंतरराष्ट्रीयवाद म्हणजे संबंध वाढविण्याची नवी दृष्टी. गांधीवादाची रचनाच आंतरराष्ट्रीयवादाची होती. ज्यामध्ये मुस्लिम नाहीत, तो हिंदुस्थान अपुरा असेल, असे ते मानत. त्यामुळेच ते मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. पाकिस्तानला नैतिकता म्हणून ५५ कोटी रुपये आपण दिले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असुरक्षित असतील तर तो त्या देशाचा पराभव आहे, असे ते म्हणत असत. त्यामुळे पुण्यातील चित्पावन कोकणस्थांनी त्यांना ठार करण्याचा कट फार पूर्वीच आखला होता. तो त्यांनी वैचारिक भूमिका म्हणून अमलात आणला.’’ झा म्हणाले, ‘‘गांधीजींना अनेक विशेषणे चिकटवली गेली. भारतामध्ये गांधींना रामधून गाणारे म्हटले गेले. हल्ली चरखा हे सजावटीचे साधन झाले आहे. गांधीजींची तत्त्वे आपण खुंटीवर टांगून ठेवली आहेत आणि त्यांच्या नावाने आपण भजन करीत आहोत. केवळ भाषण, प्रवचन दिल्याने आपण गांधीवादी होणार नाही.’’ ते म्हणाले, ‘‘गांधीहत्येनंतर या देशात उसळलेली सांप्रदायिक हत्येची नशा १९६१ पर्यंत थांबली. नंतर जबलपूरमध्ये मुस्लिमवस्त्यांवर हल्ले झाले, तेव्हा एकही समाजवादी अश्रू पुसण्यासाठी तेथे गेला नाही. त्यामुळे गांधींचे वारस म्हणविण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे.’’