शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

समान हक्काच्या मागणीमुळे गांधीजींची हत्या

By admin | Updated: January 23, 2017 03:07 IST

हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष होता. गांधीजी मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. तळागाळात असलेल्या दलितांना

पुणे : हिंदूंमध्ये मुस्लिमांविषयी द्वेष होता. गांधीजी मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. तळागाळात असलेल्या दलितांना गांधीजींनी सामाजिकदृष्ट्या समानतेच्या पातळीवर आणून ठेवल्यानेही सवर्णांच्या मनात गांधींविषयी द्वेष होता. या दोन कारणांमुळे शिक्षा म्हणून गांधीजींची हत्या करण्यात आली, असे दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद झा यांनी रविवारी येथे सांगितले. हम समाजवादी संस्थाएं या संघटनेतर्फे राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयामध्ये अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोपापूर्वीच्या सत्रामध्ये झा बोलत होते. ‘गांधीजींचा अखेरचा महिना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रीयवादाला सामावून घेणारा असावा. तसा तो नसला, तर संकुचित असेल तर तो पराभूत होतो. आंतरराष्ट्रीयवाद म्हणजे संबंध वाढविण्याची नवी दृष्टी. गांधीवादाची रचनाच आंतरराष्ट्रीयवादाची होती. ज्यामध्ये मुस्लिम नाहीत, तो हिंदुस्थान अपुरा असेल, असे ते मानत. त्यामुळेच ते मुस्लिमांना समान हक्क देण्याची मागणी करीत होते. पाकिस्तानला नैतिकता म्हणून ५५ कोटी रुपये आपण दिले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असुरक्षित असतील तर तो त्या देशाचा पराभव आहे, असे ते म्हणत असत. त्यामुळे पुण्यातील चित्पावन कोकणस्थांनी त्यांना ठार करण्याचा कट फार पूर्वीच आखला होता. तो त्यांनी वैचारिक भूमिका म्हणून अमलात आणला.’’ झा म्हणाले, ‘‘गांधीजींना अनेक विशेषणे चिकटवली गेली. भारतामध्ये गांधींना रामधून गाणारे म्हटले गेले. हल्ली चरखा हे सजावटीचे साधन झाले आहे. गांधीजींची तत्त्वे आपण खुंटीवर टांगून ठेवली आहेत आणि त्यांच्या नावाने आपण भजन करीत आहोत. केवळ भाषण, प्रवचन दिल्याने आपण गांधीवादी होणार नाही.’’ ते म्हणाले, ‘‘गांधीहत्येनंतर या देशात उसळलेली सांप्रदायिक हत्येची नशा १९६१ पर्यंत थांबली. नंतर जबलपूरमध्ये मुस्लिमवस्त्यांवर हल्ले झाले, तेव्हा एकही समाजवादी अश्रू पुसण्यासाठी तेथे गेला नाही. त्यामुळे गांधींचे वारस म्हणविण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे.’’