शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय!

By admin | Updated: May 16, 2016 02:49 IST

द्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मुंबई : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत एकच आहे. हा भारत हिंदू नाही, तर सेक्युलर असावा, अशीच या दोघांची धारणा होती. सुमेध वडावाला रिसबूड यांच्या सफाई कादंबरीत गांधी आणि आंबेडकरांना अपेक्षित असलेली जातीपलीकडे जाण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. इतकेच नव्हे, शुद्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.हिताय फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त ‘सफाई’ कादंबरीच्या लेखनासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कारदेखील या वेळी प्रदान करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड, ‘लोकमत’चे फोटो एडिटर सुधारक ओलवे, पालिकेतील सर्वाधिक शिकलेले सफाई कर्मचारी (एम.फिल) सुनील यादव, तसेच हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पंतप्रधान मोंदींनी केवळ एक दिवस हातात झाडू घेऊन काहीही होणार नाही, तर संपूर्ण यांत्रिकीकरणाद्वारे आता सफाईची कामे व्हायला हवीत. एका विशिष्ट समाजाने आता आणखी किती वर्षे सफाई करायची, अन्यथा सवर्णांनीच यापुढे सफाईची कामे करावीत, असे परखड मतही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.एमफिल पदवी संपादन केल्यानंतरही दररोज हातात झाडू घेऊन सफाई काम करणारे पालिका कर्मचारी सुनील यादव यांनीही या वेळी आपली मते व्यक्त केली. ‘हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात सुमेध वडावाला रिसबूड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कार, मानपत्र, शाल-श्रीफळ व रोख पन्नास हजार रुपये देण्यात आले. (प्रतिनिधी)