शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय!

By admin | Updated: May 16, 2016 02:49 IST

द्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मुंबई : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत एकच आहे. हा भारत हिंदू नाही, तर सेक्युलर असावा, अशीच या दोघांची धारणा होती. सुमेध वडावाला रिसबूड यांच्या सफाई कादंबरीत गांधी आणि आंबेडकरांना अपेक्षित असलेली जातीपलीकडे जाण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. इतकेच नव्हे, शुद्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.हिताय फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त ‘सफाई’ कादंबरीच्या लेखनासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कारदेखील या वेळी प्रदान करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड, ‘लोकमत’चे फोटो एडिटर सुधारक ओलवे, पालिकेतील सर्वाधिक शिकलेले सफाई कर्मचारी (एम.फिल) सुनील यादव, तसेच हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पंतप्रधान मोंदींनी केवळ एक दिवस हातात झाडू घेऊन काहीही होणार नाही, तर संपूर्ण यांत्रिकीकरणाद्वारे आता सफाईची कामे व्हायला हवीत. एका विशिष्ट समाजाने आता आणखी किती वर्षे सफाई करायची, अन्यथा सवर्णांनीच यापुढे सफाईची कामे करावीत, असे परखड मतही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.एमफिल पदवी संपादन केल्यानंतरही दररोज हातात झाडू घेऊन सफाई काम करणारे पालिका कर्मचारी सुनील यादव यांनीही या वेळी आपली मते व्यक्त केली. ‘हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात सुमेध वडावाला रिसबूड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कार, मानपत्र, शाल-श्रीफळ व रोख पन्नास हजार रुपये देण्यात आले. (प्रतिनिधी)