शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय!

By admin | Updated: May 16, 2016 02:49 IST

द्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मुंबई : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत एकच आहे. हा भारत हिंदू नाही, तर सेक्युलर असावा, अशीच या दोघांची धारणा होती. सुमेध वडावाला रिसबूड यांच्या सफाई कादंबरीत गांधी आणि आंबेडकरांना अपेक्षित असलेली जातीपलीकडे जाण्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. इतकेच नव्हे, शुद्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.हिताय फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्त ‘सफाई’ कादंबरीच्या लेखनासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला रिसबूड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कारदेखील या वेळी प्रदान करण्यात आला. त्या वेळी सबनीस बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक सुमेध वडावाला-रिसबूड, ‘लोकमत’चे फोटो एडिटर सुधारक ओलवे, पालिकेतील सर्वाधिक शिकलेले सफाई कर्मचारी (एम.फिल) सुनील यादव, तसेच हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पंतप्रधान मोंदींनी केवळ एक दिवस हातात झाडू घेऊन काहीही होणार नाही, तर संपूर्ण यांत्रिकीकरणाद्वारे आता सफाईची कामे व्हायला हवीत. एका विशिष्ट समाजाने आता आणखी किती वर्षे सफाई करायची, अन्यथा सवर्णांनीच यापुढे सफाईची कामे करावीत, असे परखड मतही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.एमफिल पदवी संपादन केल्यानंतरही दररोज हातात झाडू घेऊन सफाई काम करणारे पालिका कर्मचारी सुनील यादव यांनीही या वेळी आपली मते व्यक्त केली. ‘हिताय फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात सुमेध वडावाला रिसबूड यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर समता साहित्य पुरस्कार, मानपत्र, शाल-श्रीफळ व रोख पन्नास हजार रुपये देण्यात आले. (प्रतिनिधी)