शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे

By admin | Updated: September 25, 2014 09:22 IST

रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी आज पत्रपरिषदेत केला. या निर्णयामुळे मुंबईतील व्यवसाय स्थलांतरित होतील, अशी भीती व्यक्त करून राणे म्हणाले की, हे विभाग मुंबईत परत आणले नाहीत तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. मुंबई पोर्ट ट्रस्टची ७५ हजार कोटी रुपये किमतीची जागा एका बड्या उद्योगपतीला केमिकल पार्कच्या रुपाने देण्याचे आणि पोर्ट ट्रस्टच्या गतिविधी गुजरातमधील पोर्ट ट्रस्टकडे वळविण्याचे घाटत आहे. (विशेष प्रतिनिधी) मुंबई केंद्रशासित करण्याचा डावमुंबईचे महत्त्व कमी करतानाच ती केंद्रशासित करण्याचा केंद्राचा डाव आहे. चीनच्या पंतप्रधानांना देशाची आर्थिक राजधानीत मुंबईत न आणता गुजरातमध्ये नेण्यात आले. गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीला २०० कोटी रुपये केंद्राने दिले पण छत्रपती शिवरायांच्या मुंबईतील स्मारकासाठी एक छदामही दिला नाही, असा आरोप राणे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असे होऊ दिले नसते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.-----रिझर्व्ह बँकेने १५ जुलै २०१४ रोजी परकीय गुंतवणूक विभाग व या अंतर्गत असलेले लायझनिंग, अनिवासी भारतीयांचा परदेशी बँकिंग विभाग व अचल मालमत्ता विभाग हे तिन्ही विभाग मुंबईत असलेल्या बँकेच्या मुख्यालयातून दिल्लीतील विभागीय कार्यालयात हलविले आहेत. दिल्लीत पार्लमेंट स्ट्रीटवरील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीत हा विभाग हलविण्यात आला असून, या सर्व विभागाचे कामकाज हाताळण्यासाठी पी. श्रीराम यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. ------रिझर्व्ह बँकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक विभागांमध्ये 'व्हर्टिकल हेड्स' नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, नोटा छापण्यापासून अनेक महत्वाच्या कामांचे आऊटसोर्सिंग होत आहे. परदेशी व्यवहारासारखा विभाग दिल्लीत हलविण्यामागचा तर्क स्पष्ट व्हायला हवा. - विश्वास उटगी, सरचिटणीस, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन.