शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे

By admin | Updated: September 25, 2014 09:22 IST

रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी आज पत्रपरिषदेत केला. या निर्णयामुळे मुंबईतील व्यवसाय स्थलांतरित होतील, अशी भीती व्यक्त करून राणे म्हणाले की, हे विभाग मुंबईत परत आणले नाहीत तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. मुंबई पोर्ट ट्रस्टची ७५ हजार कोटी रुपये किमतीची जागा एका बड्या उद्योगपतीला केमिकल पार्कच्या रुपाने देण्याचे आणि पोर्ट ट्रस्टच्या गतिविधी गुजरातमधील पोर्ट ट्रस्टकडे वळविण्याचे घाटत आहे. (विशेष प्रतिनिधी) मुंबई केंद्रशासित करण्याचा डावमुंबईचे महत्त्व कमी करतानाच ती केंद्रशासित करण्याचा केंद्राचा डाव आहे. चीनच्या पंतप्रधानांना देशाची आर्थिक राजधानीत मुंबईत न आणता गुजरातमध्ये नेण्यात आले. गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीला २०० कोटी रुपये केंद्राने दिले पण छत्रपती शिवरायांच्या मुंबईतील स्मारकासाठी एक छदामही दिला नाही, असा आरोप राणे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असे होऊ दिले नसते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.-----रिझर्व्ह बँकेने १५ जुलै २०१४ रोजी परकीय गुंतवणूक विभाग व या अंतर्गत असलेले लायझनिंग, अनिवासी भारतीयांचा परदेशी बँकिंग विभाग व अचल मालमत्ता विभाग हे तिन्ही विभाग मुंबईत असलेल्या बँकेच्या मुख्यालयातून दिल्लीतील विभागीय कार्यालयात हलविले आहेत. दिल्लीत पार्लमेंट स्ट्रीटवरील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीत हा विभाग हलविण्यात आला असून, या सर्व विभागाचे कामकाज हाताळण्यासाठी पी. श्रीराम यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. ------रिझर्व्ह बँकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक विभागांमध्ये 'व्हर्टिकल हेड्स' नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, नोटा छापण्यापासून अनेक महत्वाच्या कामांचे आऊटसोर्सिंग होत आहे. परदेशी व्यवहारासारखा विभाग दिल्लीत हलविण्यामागचा तर्क स्पष्ट व्हायला हवा. - विश्वास उटगी, सरचिटणीस, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन.