शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवहन’कडून मुदतवाढीचा ‘खेळ’ सुरूच

By admin | Updated: December 4, 2015 02:02 IST

विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’

१५पर्यंत मुदतवाढ : रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण

मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’ परिवहन विभागाकडून खेळला जात आहे. आता परिवहन विभागाकडून चौथ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, अंतिम मुदत ही १५ डिसेंबर असल्याचे सांगितले आहे. याबाबत गुरुवारी गृहविभागाकडून शासन निर्णयच जाहीर करण्यात आला. ही एक वेळची संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षांचे परवाने विविध कारणास्तव रद्द झाल्यानंतर, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २0 हजार तर इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारून, त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर नूतनीकरणासाठी ३१ आॅक्टोबर ही मुदत देण्यात आली. मात्र, सतत या नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळत गेल्याने, १६ नोव्हेंबर आणि त्यानंतर ३0 नोव्हेंबर अशी अंतिम मुदत देण्यात आली. ३0 नोव्हेंबरपर्यंत जवळपास १८ हजार परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याने आणि १ लाख २२ हजार परवाने कायमचे रद्द होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात परवाने रद्द होत असल्याचे पाहता, परिवहन विभागाने एक वेळची संधी म्हणून आता १५ डिसेंबर ही मुदत दिली. ३0 नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी उर्वरित परवाने रद्द झाल्याचे आणि त्यांना पुढील नव्या परवाना लॉटरीत सहभागी होता येणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे परिवहन विभागाचा एकूणच सावळा गोंधळही यातून दिसून आला आहे.