शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

‘परिवहन’कडून मुदतवाढीचा ‘खेळ’ सुरूच

By admin | Updated: December 4, 2015 02:02 IST

विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’

१५पर्यंत मुदतवाढ : रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण

मुंबई : विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’ परिवहन विभागाकडून खेळला जात आहे. आता परिवहन विभागाकडून चौथ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, अंतिम मुदत ही १५ डिसेंबर असल्याचे सांगितले आहे. याबाबत गुरुवारी गृहविभागाकडून शासन निर्णयच जाहीर करण्यात आला. ही एक वेळची संधी असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील १ लाख ४0 हजार ६५ रिक्षांचे परवाने विविध कारणास्तव रद्द झाल्यानंतर, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २0 हजार तर इतर क्षेत्रामध्ये १५ हजार सहमत शुल्क आकारून, त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. १ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर नूतनीकरणासाठी ३१ आॅक्टोबर ही मुदत देण्यात आली. मात्र, सतत या नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळत गेल्याने, १६ नोव्हेंबर आणि त्यानंतर ३0 नोव्हेंबर अशी अंतिम मुदत देण्यात आली. ३0 नोव्हेंबरपर्यंत जवळपास १८ हजार परवान्यांचेच नूतनीकरण झाल्याने आणि १ लाख २२ हजार परवाने कायमचे रद्द होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात परवाने रद्द होत असल्याचे पाहता, परिवहन विभागाने एक वेळची संधी म्हणून आता १५ डिसेंबर ही मुदत दिली. ३0 नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी उर्वरित परवाने रद्द झाल्याचे आणि त्यांना पुढील नव्या परवाना लॉटरीत सहभागी होता येणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे परिवहन विभागाचा एकूणच सावळा गोंधळही यातून दिसून आला आहे.