शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

मेट्रोच्या श्रेयात गायकवाडांची उडी

By admin | Updated: November 2, 2016 03:26 IST

डोंबिवली मेट्रोच्या श्रेयावरून वाद रंगलेला असताना कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनीही त्यात उडी घेतली

कल्याण : कल्याणहून भिवंडीमार्गे ठाण्याला जाणाऱ्या मेट्रोचा सध्याचा मार्ग निम्म्याहून ्धिक कल्याणसाठी गैरसोयीचा आहे. त्यामुळे तो बदलण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी केली आहे. एपीएमसीतून आग्रा रोडमार्गे दुर्गाडीला जाण्याऐवजी रेल्वे स्टेशन, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, दुर्गाडीमार्गे ही रेल्वे भिवंडीला नेल्यास मोठ्या लोकसंख्येला तिचा उपयोग होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मार्गावरून शीळ-भिवंडी उड्डाणरस्ता जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.सध्याचा मार्ग चुकीचा असल्याने मेट्रोचा भिवंडीला जितका फायदा होईल, तितका कल्याणला होणार नाही. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच हा मार्ग दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नव्या मार्गाचा फायदा भवानी चौक, बिर्ला गेट, खडकपाडा, आधारवाडी या भागाला होईल. शहाडला राहणाऱ्यांनाही मेट्रोचा दिलासा मिळेल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना देण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. मेट्रोच्या श्रेयाच्या वादात शिवसेनेने भाजपावर कुरघोडीचा प्रयत्न चालवला असतानाच हा मार्गबदलाचा मुद्दा समोर आला आहे. (प्रतिनिधी)>कोंडी आणखी काही वर्षेमेट्रोमुळे भविष्यात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असली, तरी तो मार्ग पूर्ण होईपर्यंत मात्र नागरिकांना रस्त्यांतील रेल्वेच्या कामामुळे किमान चार ते पाच वर्षे कोंडीचा सामना करावा लागणार आहे. शीळ ते भिवंडी मार्गावरून जाणारा उड्डाणपूल, कल्याण-शीळ आणि कल्याण-भिवंडी मेट्रोमुळे शहरातील रस्ते खोदले जातील. त्यामुळे हे सर्व प्रकल्प सुरू होऊन प्रत्यक्षात येईपर्यंत वेगवेगळ््या मार्गाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. अंबरनाथ, बदलापूरला टाटा : २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणली जाईल, असे आश्वासन दिले होते. आघाडीने केवळ मेट्रोचे स्वप्न दाखविले. ते भाजप सरकारने पूर्णत्वास नेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र युती सरकारनेही मेट्रो कल्याणला आणली, पण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील नागरिकांचा भ्रमनिरास केल्याची टीका सुरू झाली आहे.