शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांपेक्षा गडकरींवर विश्वास

By admin | Updated: January 29, 2016 23:53 IST

नारायण राणे : मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा करू नये

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आपला अधिक विश्वास आहे, अशा स्पष्ट शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. एका बाजूला राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी गडकरी यांच्यावर मात्र स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.निमित्त होते मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजनाचे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी गडकरी यांनी स्वत: नारायण राणे यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या राणे यांनी एका बाजूला गडकरी यांचे कौतुक आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारवर टीका, असे सणसणीत भाषण केले.महामार्ग चौपदरीकरणाबाबतचा कार्यक्रम असला तरी आपण कोकणच्या व्यथा मांडणार असल्याचे सांगत राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी जागा आहे का? त्याचे भूसंपादन झाले आहे का? असे प्रश्न त्यांनी केले. या प्रकल्पासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलाच नसल्याची माहिती मंत्रालयातून मिळाली असल्याचे राणे यांनी सांगितले.नवे जंगल उभे करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आहेत ती जंगले वाचवावीत, असा टोलाही त्यांनी हाणला. सिंधुदुर्गातील रखडलेले विमानतळ, कोणत्याही कामासाठी उपलब्ध होत नसलेला निधी, आरोग्य केंद्र, शाळा आणि रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक मुद्द्यांबाबत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा करू नयेत, कृती करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.गडकरी दिलेला शब्द पाळतात. माझा त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मुख्यमंत्री घाईघाईत येतात आणि पैसे न देता निघून जातात, असा टोला त्यांनी हाणला.गडकरी यांच्यामुळेच चौपदरीकरणाच्या कामाला गती आली असल्याचे राणे यांनी सांगितले आणि उर्वरित प्रश्नांबाबतही गडकरी यांनी लक्ष घातले तर तेही सुटतील, असा विश्वासही दाखवला. माजी मुख्यमंत्री म्हणून आणि चौपदरीकरणासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा केला म्हणून गडकरी यांनीच आपल्याला येथे बोलावले आणि गडकरी यांच्यामुळेच आपल्याला बोलायची संधी मिळाली, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. (प्रतिनिधी)