शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

मुख्यमंत्र्यांपेक्षा गडकरींवर विश्वास

By admin | Updated: January 29, 2016 23:53 IST

नारायण राणे : मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा करू नये

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आपला अधिक विश्वास आहे, अशा स्पष्ट शब्दांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. एका बाजूला राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी गडकरी यांच्यावर मात्र स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.निमित्त होते मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजनाचे. रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी गडकरी यांनी स्वत: नारायण राणे यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या राणे यांनी एका बाजूला गडकरी यांचे कौतुक आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारवर टीका, असे सणसणीत भाषण केले.महामार्ग चौपदरीकरणाबाबतचा कार्यक्रम असला तरी आपण कोकणच्या व्यथा मांडणार असल्याचे सांगत राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी जागा आहे का? त्याचे भूसंपादन झाले आहे का? असे प्रश्न त्यांनी केले. या प्रकल्पासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलाच नसल्याची माहिती मंत्रालयातून मिळाली असल्याचे राणे यांनी सांगितले.नवे जंगल उभे करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आहेत ती जंगले वाचवावीत, असा टोलाही त्यांनी हाणला. सिंधुदुर्गातील रखडलेले विमानतळ, कोणत्याही कामासाठी उपलब्ध होत नसलेला निधी, आरोग्य केंद्र, शाळा आणि रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक मुद्द्यांबाबत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा करू नयेत, कृती करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.गडकरी दिलेला शब्द पाळतात. माझा त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मुख्यमंत्री घाईघाईत येतात आणि पैसे न देता निघून जातात, असा टोला त्यांनी हाणला.गडकरी यांच्यामुळेच चौपदरीकरणाच्या कामाला गती आली असल्याचे राणे यांनी सांगितले आणि उर्वरित प्रश्नांबाबतही गडकरी यांनी लक्ष घातले तर तेही सुटतील, असा विश्वासही दाखवला. माजी मुख्यमंत्री म्हणून आणि चौपदरीकरणासाठी जास्तीत जास्त पाठपुरावा केला म्हणून गडकरी यांनीच आपल्याला येथे बोलावले आणि गडकरी यांच्यामुळेच आपल्याला बोलायची संधी मिळाली, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. (प्रतिनिधी)