शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या मार्गात गडकरी!

By admin | Updated: December 20, 2014 03:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. दोघेही रेशीम बागेच्या तालमीत तयार झाल्याने एकमेकांचे डावपेच ते चांगलेच ओळखून आहेत. मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड झाल्यापासून तर दोघांमधील ‘वैचारिक’ दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. शुक्रवारी विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नावर बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘राज्याचा विकास यापुढे विदर्भकेंद्रित असेल’ असे सांगितले, तर त्याच वेळी विधान भवनच्या प्रांगणात आलेल्या गडकरींनी मात्र राज्याच्या समतोल विकासाचा राग आळवला!देवेंद्रला मीच मोठे केले - खडसे देवेंद्र फडणवीस यांना मीच सक्रिय केले. विदेशात भाषणांची संधी दिली. देवेंद्रला मीच मोठे केले, असे सांगत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नवा वाद छेडला. > यापुढे विदर्भकेंद्रित विकास - मुख्यमंत्री विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची यापुढील दिशा ही विदर्भकेंद्रित असेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठी माणसांचे एकच राज्य केले नाही तर मुंबई गुजरातकडे जाईल, या भीतीने विदर्भाला सोबत घेण्यात आले आणि त्याला विदर्भाने ओ दिला. मात्र त्या वेळी समतोल विकासाचा विदर्भाला दिलेला शब्द नंतर पाळण्यात आला नाही. विदर्भात अन्यायाची भावना अन्याय झाला म्हणून आहे, राजकारणापोटी नाही. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३७१(२) नुसार निधीच्या समन्यायी वाटपाचे दिलेले निर्देश गेल्या १५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पायदळी तुडवले. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राकडे निधी कसा वळविला, याचीही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचा समतोल विकास हवा - गडकरीच्स्वतंत्र विदर्भाबाबत मी शंभरवेळा बोललो असून आपल्याला त्यासंबंधी पुन्हा बोलायचे नाही, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशी केवळ वेगवेगळ््या विभागांच्या विकासापुरती मर्यादित भूमिका घेऊन चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाण्याची परिस्थिती बिकट आहे. च्राज्यासमोरील समस्यांचे संधीत रूपांतर करून भांडवली गुंतवणूक वाढवणे आणि रोजगारनिर्मिती करणे याला प्राधान्य दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. प्रदूषणविरहित इंधनावर चालणारी पहिली बससेवा नागपूरमध्ये सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.