शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

By admin | Updated: October 21, 2014 00:53 IST

लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे

मतभेदांच्या अफवा : उत्तम समन्वयाने साधला विजयनागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला एकतर्फी कौल दिला. विशेष म्हणजे निवडणूक काळात कितीही अफवा उडाल्या तरी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे डाव साधल्या गेला. भाजपसमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान होते. त्यातही गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते नागपुरातील असल्याने नागपूरची कुठलीही जागा गमावून चालणार नव्हते. याची जाणीव या दोन्ही नेत्यांना असल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले. निवडणुकीत गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या यंत्रणा काम करीत होत्या. मात्र, ही यंत्रणा कुणाच्याही एकमेकांच्या मार्गात आडवी आली नाही. उलट जेथे एक यंत्रणा कमी पडताना दिसली तेथे दुसरी यंत्रणा तत्काळ धावून गेली. दोन्ही नेत्यांमध्ये जबरदस्त समन्वय होता. विशेष म्हणजे शहर व जिल्ह्यातील बहुतांश तिकीट वाटप गडकरींच्या मनाने झाले. त्याला फडणवीसांची पूर्ण संमती होती. या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. त्यानंतरही ते विचलित झाले नाही. उलट अधिक समन्वयाने आव्हानाला सामोरे गेले. फडणवीस यांना राज्यात प्रचारासाठी फिरायचे होते. मतदारसंघात अधिक लक्ष देणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गडकरींची फौज दक्षिण-पश्चिममध्ये धावून गेली. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण निवडणूक निकालानेच दिले. लोकसभेमध्ये गडकरींना दक्षिण-पश्चिममध्ये ६० हजारावर लीड होती, तर फडणवीस यांनादेखील त्याच्याच आसपास लीड मिळाली. राज्यात भाजपची सत्ता आणण्याचे या दोन्ही नेत्यांचे ध्येय होते. त्यामुळे प्रत्येक जागा जिंकणे आवश्यक होते. पश्चिम नागपुरात सुधाकर देशमुख अडचणीत असल्याचे लक्षात येताच, शेवटच्या तीन दिवसात या नेत्यांनी पक्षाचे कॅडर पश्चिममध्ये सक्रिय केले. खा. अजय संचेती यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. सर्वांना हाताशी धरून कामाला लावण्यात आले. दक्षिण नागपुरात सुधाकर कोहळे यांच्यासाठीही अशीच जबाबदारी पार पाडण्यात आली. त्याचा परिणामही दिसून आला. काटोल, हिंगणा, रामटेक या मतदारसंघातही दोन्ही नेत्यांनी विश्वासातील लोकांना कामी लावले. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात संवाद साधला. नाराजांना भविष्यात सामावून घेण्याचा विश्वास दिला, तर दुसऱ्या पक्षातील नाराजांना पक्षात घेत कामी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या समन्वयातूनच विजयाचा मार्ग सुकर झाला. (प्रतिनिधी)