शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

By admin | Updated: October 21, 2014 00:53 IST

लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे

मतभेदांच्या अफवा : उत्तम समन्वयाने साधला विजयनागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला एकतर्फी कौल दिला. विशेष म्हणजे निवडणूक काळात कितीही अफवा उडाल्या तरी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे डाव साधल्या गेला. भाजपसमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान होते. त्यातही गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते नागपुरातील असल्याने नागपूरची कुठलीही जागा गमावून चालणार नव्हते. याची जाणीव या दोन्ही नेत्यांना असल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले. निवडणुकीत गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या यंत्रणा काम करीत होत्या. मात्र, ही यंत्रणा कुणाच्याही एकमेकांच्या मार्गात आडवी आली नाही. उलट जेथे एक यंत्रणा कमी पडताना दिसली तेथे दुसरी यंत्रणा तत्काळ धावून गेली. दोन्ही नेत्यांमध्ये जबरदस्त समन्वय होता. विशेष म्हणजे शहर व जिल्ह्यातील बहुतांश तिकीट वाटप गडकरींच्या मनाने झाले. त्याला फडणवीसांची पूर्ण संमती होती. या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. त्यानंतरही ते विचलित झाले नाही. उलट अधिक समन्वयाने आव्हानाला सामोरे गेले. फडणवीस यांना राज्यात प्रचारासाठी फिरायचे होते. मतदारसंघात अधिक लक्ष देणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गडकरींची फौज दक्षिण-पश्चिममध्ये धावून गेली. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण निवडणूक निकालानेच दिले. लोकसभेमध्ये गडकरींना दक्षिण-पश्चिममध्ये ६० हजारावर लीड होती, तर फडणवीस यांनादेखील त्याच्याच आसपास लीड मिळाली. राज्यात भाजपची सत्ता आणण्याचे या दोन्ही नेत्यांचे ध्येय होते. त्यामुळे प्रत्येक जागा जिंकणे आवश्यक होते. पश्चिम नागपुरात सुधाकर देशमुख अडचणीत असल्याचे लक्षात येताच, शेवटच्या तीन दिवसात या नेत्यांनी पक्षाचे कॅडर पश्चिममध्ये सक्रिय केले. खा. अजय संचेती यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. सर्वांना हाताशी धरून कामाला लावण्यात आले. दक्षिण नागपुरात सुधाकर कोहळे यांच्यासाठीही अशीच जबाबदारी पार पाडण्यात आली. त्याचा परिणामही दिसून आला. काटोल, हिंगणा, रामटेक या मतदारसंघातही दोन्ही नेत्यांनी विश्वासातील लोकांना कामी लावले. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात संवाद साधला. नाराजांना भविष्यात सामावून घेण्याचा विश्वास दिला, तर दुसऱ्या पक्षातील नाराजांना पक्षात घेत कामी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या समन्वयातूनच विजयाचा मार्ग सुकर झाला. (प्रतिनिधी)