शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

By admin | Updated: October 21, 2014 00:53 IST

लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे

मतभेदांच्या अफवा : उत्तम समन्वयाने साधला विजयनागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला एकतर्फी कौल दिला. विशेष म्हणजे निवडणूक काळात कितीही अफवा उडाल्या तरी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे डाव साधल्या गेला. भाजपसमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान होते. त्यातही गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते नागपुरातील असल्याने नागपूरची कुठलीही जागा गमावून चालणार नव्हते. याची जाणीव या दोन्ही नेत्यांना असल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले. निवडणुकीत गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या यंत्रणा काम करीत होत्या. मात्र, ही यंत्रणा कुणाच्याही एकमेकांच्या मार्गात आडवी आली नाही. उलट जेथे एक यंत्रणा कमी पडताना दिसली तेथे दुसरी यंत्रणा तत्काळ धावून गेली. दोन्ही नेत्यांमध्ये जबरदस्त समन्वय होता. विशेष म्हणजे शहर व जिल्ह्यातील बहुतांश तिकीट वाटप गडकरींच्या मनाने झाले. त्याला फडणवीसांची पूर्ण संमती होती. या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. त्यानंतरही ते विचलित झाले नाही. उलट अधिक समन्वयाने आव्हानाला सामोरे गेले. फडणवीस यांना राज्यात प्रचारासाठी फिरायचे होते. मतदारसंघात अधिक लक्ष देणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गडकरींची फौज दक्षिण-पश्चिममध्ये धावून गेली. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण निवडणूक निकालानेच दिले. लोकसभेमध्ये गडकरींना दक्षिण-पश्चिममध्ये ६० हजारावर लीड होती, तर फडणवीस यांनादेखील त्याच्याच आसपास लीड मिळाली. राज्यात भाजपची सत्ता आणण्याचे या दोन्ही नेत्यांचे ध्येय होते. त्यामुळे प्रत्येक जागा जिंकणे आवश्यक होते. पश्चिम नागपुरात सुधाकर देशमुख अडचणीत असल्याचे लक्षात येताच, शेवटच्या तीन दिवसात या नेत्यांनी पक्षाचे कॅडर पश्चिममध्ये सक्रिय केले. खा. अजय संचेती यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. सर्वांना हाताशी धरून कामाला लावण्यात आले. दक्षिण नागपुरात सुधाकर कोहळे यांच्यासाठीही अशीच जबाबदारी पार पाडण्यात आली. त्याचा परिणामही दिसून आला. काटोल, हिंगणा, रामटेक या मतदारसंघातही दोन्ही नेत्यांनी विश्वासातील लोकांना कामी लावले. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात संवाद साधला. नाराजांना भविष्यात सामावून घेण्याचा विश्वास दिला, तर दुसऱ्या पक्षातील नाराजांना पक्षात घेत कामी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या समन्वयातूनच विजयाचा मार्ग सुकर झाला. (प्रतिनिधी)