शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

गडकरींच्या प्रमाणपत्राची कऱ्हाडला गरज नाही

By admin | Updated: October 7, 2014 23:48 IST

पृथ्वीराज चव्हाण : मुक्ताफळे उधळणाऱ्यांचा घेतला खरफूस समाचार

कऱ्हाड : ‘भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपच्या गडावरून नितीन गडकरींना पायउतार व्हावे लागले, हे मला माहीत होते; पण माझ्यावर ते बिनबुडाचे आरोप करीत सुटलेत, त्यामुळे त्यांची बुद्धीही भ्रष्ट झालीय, याची खात्री वाटते. एवढा खोटारडा माणूस आयुष्यात बघितलेला नाही,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नितीन गडकरींना लगावला़कऱ्हाड येथे विठ्ठल चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़ आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, आनंदराव पालकर, बादशहा मुल्ला, अशोकराव पाटील, बाबासाहेब पटेल, विनायक विभुते, विजय वाटेगावकर, बापू देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती़ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘नागपूरचा एक ‘गडी’ आज कऱ्हाडात आला होता, त्यानं इथं अनेक ‘मुक्ताफळे’ उधळली़ माझ्यावर बेछूट आरोप करून चार मते मिळविण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या पक्षनिष्ठेची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे़ गडकरींच्या सर्टिफिकेटची कऱ्हाडकरांना गरज नाही,’ अशी खिल्ली उडवली़ ‘आज महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळविले जात आहेत़ महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर निवडून आलेले गडकरींसारखे भाट गुजरातचेच गोडवे गात आहेत़ महाराष्ट्र आजही गुजरातपेक्षा पुढे आहे़ म्हणून तर गुजरातची माणसं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राहतात़ तुलनेत महाराष्ट्रीयन माणूस गुजरातमध्ये कमी आहे़ ’ उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव म्हणाले, ‘राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याने मी स्वगृही परतलोय, पृथ्वीराज चव्हाण हा कऱ्हाडचा स्वाभिमान आहे़’ यावेळी नगरसेविका स्मिता हुलवान, फारुक पटवेकर, आनंदा लादे आदींची भाषणे झाली़ यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, पुन्हा १९६० साली महाराष्ट्र-गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये झाली़ त्याच गुजरातचे नेते आता महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव करीत आहेत़ भाजपचा हा डाव सुुज्ञ जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही़ कऱ्हाडातील यशवंत विचारांचे पाईक त्यात सर्वात पुढे राहतील,’ असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला़ आजही चर्चेला तयार गुजरात मॉडेलची टिमकी वाजविणाऱ्या मोदींना लोकसभा निवडणुकीपासून मी कोणते राज्य पुढे, या मुद्द्यावर समोरासमोर चर्चेला तयार असल्याचे सांगितले़ प्रत्येक मुद्द्यावर मी आजही बोलायला तयार आहे़ पण, मोदी अन् भाजप ग्लोबल नीतीचा वापर करीत आहेत़