शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीची धावपट्टी पाच वर्षांपासून रखडली

By admin | Updated: September 14, 2014 01:05 IST

छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या

सरकारचे दुर्लक्ष : जागेचा शोध घेऊनही कामाला सुरूवात नाहीगडचिरोली : छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील हवाईपट्टीचे काम मागील पाच वर्षांपासून रखडलेले आहे. २००९ हे वर्ष पोलीस दलासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वात काळे वर्ष ठरले. पोलीस-नक्षल चकमकीत ५१ पोलीस जवान शहीद झालेत. पोलीस जवानांना मानवंदना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर्षी गडचिरोलीत आले होते. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे हवाईपट्टी बांधण्याचा निर्णय जाहीर केला. लगेच जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन जागेचा शोधही सुरू झाला. बोदली, मेंढा, माडेतुकूम गावालगत जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र स्थानिक शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान जागा निश्चित करण्यात आली. राज्य शासनाची एक चमूही या ठिकाणी जागेचे मोजमाप करण्यासाठी आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी शासनाच्या या चमूला जिल्हाधिकारी कार्यालयात जागेबाबतही विस्तृत माहितीही दिली होती. पोलीस प्रशासनाला हेलिकॉप्टरही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मागील पाच वर्षात हवाईपट्टीच्या कामाची किंचितही प्रगती होऊ शकली नाही. नक्षल घटनेनंतर जखमी पोलीस जवानांना उपचारासाठी तत्काळ नागपुरात नेता यावे यासाठी या हवाईपट्टीचे निर्माण होणार होते. याशिवाय या छोट्या विमानतळाचा गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही फायदाच होणार होता. मात्र हवाईपट्टी रखडल्याने सारे स्वप्नवत् ठरले आहे. आता परत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव पी.एस. मिना यांनी गडचिरोलीचे विमानतळ होईल, असे सुतोवाच केले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच आहे.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण व गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये विमानतळासाठी जागा अधिग्रहीत करण्यावरून वादंग निर्माण झाल्याने हवाईपट्टीचा हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)