शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

गडचिरोलीची धावपट्टी पाच वर्षांपासून रखडली

By admin | Updated: September 14, 2014 01:05 IST

छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या

सरकारचे दुर्लक्ष : जागेचा शोध घेऊनही कामाला सुरूवात नाहीगडचिरोली : छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील हवाईपट्टीचे काम मागील पाच वर्षांपासून रखडलेले आहे. २००९ हे वर्ष पोलीस दलासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वात काळे वर्ष ठरले. पोलीस-नक्षल चकमकीत ५१ पोलीस जवान शहीद झालेत. पोलीस जवानांना मानवंदना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर्षी गडचिरोलीत आले होते. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे हवाईपट्टी बांधण्याचा निर्णय जाहीर केला. लगेच जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन जागेचा शोधही सुरू झाला. बोदली, मेंढा, माडेतुकूम गावालगत जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र स्थानिक शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान जागा निश्चित करण्यात आली. राज्य शासनाची एक चमूही या ठिकाणी जागेचे मोजमाप करण्यासाठी आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी शासनाच्या या चमूला जिल्हाधिकारी कार्यालयात जागेबाबतही विस्तृत माहितीही दिली होती. पोलीस प्रशासनाला हेलिकॉप्टरही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मागील पाच वर्षात हवाईपट्टीच्या कामाची किंचितही प्रगती होऊ शकली नाही. नक्षल घटनेनंतर जखमी पोलीस जवानांना उपचारासाठी तत्काळ नागपुरात नेता यावे यासाठी या हवाईपट्टीचे निर्माण होणार होते. याशिवाय या छोट्या विमानतळाचा गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही फायदाच होणार होता. मात्र हवाईपट्टी रखडल्याने सारे स्वप्नवत् ठरले आहे. आता परत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव पी.एस. मिना यांनी गडचिरोलीचे विमानतळ होईल, असे सुतोवाच केले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच आहे.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण व गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये विमानतळासाठी जागा अधिग्रहीत करण्यावरून वादंग निर्माण झाल्याने हवाईपट्टीचा हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)