शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

गडचिरोलीची धावपट्टी पाच वर्षांपासून रखडली

By admin | Updated: September 14, 2014 01:05 IST

छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या

सरकारचे दुर्लक्ष : जागेचा शोध घेऊनही कामाला सुरूवात नाहीगडचिरोली : छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील हवाईपट्टीचे काम मागील पाच वर्षांपासून रखडलेले आहे. २००९ हे वर्ष पोलीस दलासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वात काळे वर्ष ठरले. पोलीस-नक्षल चकमकीत ५१ पोलीस जवान शहीद झालेत. पोलीस जवानांना मानवंदना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर्षी गडचिरोलीत आले होते. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे हवाईपट्टी बांधण्याचा निर्णय जाहीर केला. लगेच जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन जागेचा शोधही सुरू झाला. बोदली, मेंढा, माडेतुकूम गावालगत जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र स्थानिक शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान जागा निश्चित करण्यात आली. राज्य शासनाची एक चमूही या ठिकाणी जागेचे मोजमाप करण्यासाठी आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी शासनाच्या या चमूला जिल्हाधिकारी कार्यालयात जागेबाबतही विस्तृत माहितीही दिली होती. पोलीस प्रशासनाला हेलिकॉप्टरही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मागील पाच वर्षात हवाईपट्टीच्या कामाची किंचितही प्रगती होऊ शकली नाही. नक्षल घटनेनंतर जखमी पोलीस जवानांना उपचारासाठी तत्काळ नागपुरात नेता यावे यासाठी या हवाईपट्टीचे निर्माण होणार होते. याशिवाय या छोट्या विमानतळाचा गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही फायदाच होणार होता. मात्र हवाईपट्टी रखडल्याने सारे स्वप्नवत् ठरले आहे. आता परत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव पी.एस. मिना यांनी गडचिरोलीचे विमानतळ होईल, असे सुतोवाच केले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच आहे.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण व गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये विमानतळासाठी जागा अधिग्रहीत करण्यावरून वादंग निर्माण झाल्याने हवाईपट्टीचा हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)