शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

गडचिरोलीला पुराचा फटका

By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST

विदर्भात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २४ तासात सरासरी ६५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सर्वात कमी पाऊस बुलडाण्यात : अकोला-वाशिम कोरडेनागपूर : विदर्भात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २४ तासात सरासरी ६५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. कठाणी, खोब्रागडी, पाल, वैनगंगा, पामुलगौतम नद्या फुगल्या आहेत. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ४३८६.९ मिमी पाऊस झाला असून त्याची सरासरी ३६५.५० एवढी आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड येथील राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत पोहोचले आहे. यामुळे या चौकातील दुकानदारांनी आपल्या दुकानातील सामान इतरत्र हलविले असल्याची माहिती आहे. गडचिरोलीनजीकची कठाणी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीचे पाणी पुलाला भिडले आहे. सोमवारी दिवसभर संततधार कायम राहिल्यास गडचिरोली-आरमोरी-नागपूर मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. भामरागड, कोरची तालुक्यात अतिवृष्टीमुळे लहान नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने अंतर्गत मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यात रिमझीम पावसाच्या सरी कोसळत आहे. दिवसभरात जिल्ह्यातील १४ तालुक्यात पावसाने कमी जास्त प्रमाणात हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सरासरी ७.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. २० जुलैपर्यंत करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस पोषक ठरणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी ३०.३६ मिमी आणि जून ते २१ जुलैपर्यंत १९३ मि.मि. पावसाची नोंद झाली. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली असून या पावसामुळे पिकांना फायदा होणार आहे. चिमूर, ब्रह्मपुरी, कोरपना तालुक्यात नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कोरपना तालुक्यातील एका गावातील रपट्यावरून पाणी वाहत आहे.यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात केवळ ४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट कायम आहे. गोंदिया जिल्ह्यात संततधार पाऊस व वाऱ्यामुळे काही भागात झाडे तुटून वीज तारांवर पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. मात्र कुठेही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. भंडारा जिल्ह्यात दमदार पावसामुळे दुबार पेरणीनंतर आलेल्या पऱ्ह्यांची रोवणी करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)शनिवारी दुपारपासूनच पावसाला सुरूवात झाली. पावसाची ही झळ रविवारीही दिवसभर कायम होती. जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ५३ मि.मी. पाऊस बरसला. वर्धा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यात सोमवारी सकाळी सरासरी ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक २१.२ मिमी. पाऊस हिंगणघाट तालुक्यात झाला. बुलडाणा जिल्ह्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली.