शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंगच्या १५४० विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: November 1, 2016 19:01 IST

निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. त्यामुळे या स्कूलमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनीं

ऑनलाइन लोकमत/विलास गावंडे
यवतमाळ, दि. 01 - निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. त्यामुळे या स्कूलमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे. निकषात बसत नसतानाही प्रवेश देऊन या महाविद्यालयांनी खेळ चालविला, अशी भावना विद्यार्थिनींमध्ये निर्माण झाली आहे. 
भारतीय परिचर्या परिषद दिल्लीकडून प्रत्येक तीन वर्षाने नर्सिंग स्कूलची तपासणी केली जाते. शिवाय या नर्सिंग स्कूलला प्रथम वर्ष प्रवेशासाठी दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नवीन शैक्षणिक सत्रासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दृष्टीने आवश्यक ती तपासणी भारतीय परिचर्या परिषदेकडून झाली. यात काही नर्सिंग स्कूलने निकष पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले. सुसज्ज प्रयोगशाळा, आवश्यक तेवढे शिक्षक ही निकषे प्रामुख्याने तपासली गेली. याबाबी पूर्ण न केलेल्या स्कूलची मान्यता रद्द करण्यात आली आहे. महाराष्टÑ परिचर्या परिषदेने २९ आॅक्टोबर रोजी मान्यता रद्द झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे.
परिचर्या प्रशिक्षण प्रसविका या दोन वर्षांच्या आणि सामान्य परिचर्या प्रशिक्षण या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी १ ते ३ आॅक्टोबरपर्यंत नर्सिंग स्कूलने प्रवेश प्रक्रिया राबविली. आवश्यक ती सर्व प्रक्रिया विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आली. प्रत्येक स्कूलमध्ये २० विद्यार्थिनींना प्रवेश दिला गेला. आता ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता रद्द झाली आहे. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींना इतर ठिकाणच्या प्रवेशाची दारे बंद झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या या अभ्यासक्रमातील भवितव्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. १२ वी नंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. अर्धेअधिक शैक्षणिक सत्र संपले असल्याने इतर अभ्यासक्रमालाही या विद्यार्थिनी मुकणार आहे. या परिस्थितीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे. 
 
मान्यता रद्द झालेले नर्सिंग स्कूल
वर्धा चार, भंडारा तीन, यवतमाळ तीन, बुलडाणा तीन, गडचिरोली दोन, गोंदिया तीन, चंद्रपूर एक, अमरावती एक, अकोला एक, नांदेड दोन, अहमदनगर आठ, हिंगोली तीन, परभणी सात, औरंगाबाद सहा, मुंबई एक, नाशिक तीन, सांगली तीन, बीड चार, ठाणे एक, रत्नागिरी एक, लातूर पाच, उस्मानाबाद एक, नंदूरबार दोन, सोलापूर दोन.