शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

भिवंडीत चार अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त

By admin | Updated: May 19, 2017 02:25 IST

भिवंडीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या चार अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवडी आणि ठाणे पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : भिवंडीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या चार अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवडी आणि ठाणे पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १७ लाख ५४ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अनधिकृत एक्सचेंजमुळे केंद्र सरकारचा ३० कोटींपेक्षा अधिक महसूलाचे नुकसान झाले असून त्याचा देश विघातक कारवायांसाठीही उपयोग केला किंवा कसे याबाबतचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.सुफियान अन्सारी, इकबाल सुलेमान, मो. अस्लम शेख आणि युनूस हाज्मी आदी पाच जणांना अटक याप्रकरणी अटक झाली आहे. भिवंडीत अनधिकृतपणे टेलिफोन एक्सचेंज सुरू करुन परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी (व्हॉईस आॅव्हर इंटरनेट प्रॉटोकॉल) कॉल हे अनधिकृत सीम बॉक्सचा वापर करुन त्यात भारतीय कंपनीचे सिम कार्डस वापरुन भारतातील इच्छित मोबाईल क्रमांकावर केले जात असल्याची माहिती भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने केंद्रीय टेलिकम्युनिकेशन विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध पथके तयार करुन १७ मे रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास आरोपींच्या घरी तसेच त्यांच्या टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून त्यांना अटक केली. या कारवाईत १८ सिम बॉक्सेस आढळले. या बॉक्सेस मध्ये रिलायन्स आणि टाटा डोकोमो या कंपनीचे सुमारे ४२० सिमकार्डस मिळाले. सिमबॉक्स हे इंटरनेट कनेक्शनला राऊटरच्या मार्फतीने जोडले होते. तसेच या यंत्रामध्ये बसविलेल्या विविध सिमकार्डद्वारे परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल भारतीय मोबाईल क्रमांक तथा दूरध्वनी क्रमांकाशी जोडले जात होते. तसेच आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी वॉईस कॉल हे सेल्युलर नेटवर्कमध्ये डोमॅस्टीक (देशांतर्गत) कॉल म्हणून जोडले जात होते. त्यामुळे भारतातील मोबाईल क्रमांकाच्या डिस्प्लेवर परदेशातील मोबाईल क्रमांक न येता भारतातील मोबाईल कंपनीचे क्रमांक यायचे. हे फोन कोणत्याही सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागत नाहीत. या कॉल्सची नोंद टेलिकम्युनिकेशन विभागाकडेही (डिओटी) होत नसल्याने भारत सरकारचा आतापर्यंत ३० कोटींचा महसूलही बुडाल्याचे उघड झाले आहे.देशविघातक कारवायांसाठी वापर?- अशा अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे होणाऱ्या कॉलचा वापर देशविघातक आणि इतर अवैध बेकायदेशीर कामांसाठी केला जाण्याची शक्यताही सिंग यांनी वर्तविली.ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर असून, याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, भारतीय टेलिग्राफ कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरूया संपूर्ण टेलिफोन एक्सचेंजची यंत्रणा राबविणाऱ्या टोळीचा म्होरक्या टाटा आणि रिलायन्सचा माजी कर्मचारी आहे. त्याचाही आता कसून शोध घेण्यात येत आहे.हवालासाठी उपयोग?अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांमधून या टेलिफोन केंद्रावर कॉल्स येत होते. अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नसली तरी गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांसाठी तसेच हवालामार्फत येणाऱ्या पैशांसाठीही या कॉल सेंटरचा उपयोग केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदेशातून येणाऱ्या या कॉल्सचा कोण वापर करीत होते? यामागे आणखी कोणती टोळी कार्यरत आहे का? या सर्व बाबींचाही तपास करण्यात येत आहे.