शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भिवंडीत चार अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त

By admin | Updated: May 19, 2017 02:25 IST

भिवंडीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या चार अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवडी आणि ठाणे पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : भिवंडीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या चार अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवडी आणि ठाणे पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १७ लाख ५४ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अनधिकृत एक्सचेंजमुळे केंद्र सरकारचा ३० कोटींपेक्षा अधिक महसूलाचे नुकसान झाले असून त्याचा देश विघातक कारवायांसाठीही उपयोग केला किंवा कसे याबाबतचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.सुफियान अन्सारी, इकबाल सुलेमान, मो. अस्लम शेख आणि युनूस हाज्मी आदी पाच जणांना अटक याप्रकरणी अटक झाली आहे. भिवंडीत अनधिकृतपणे टेलिफोन एक्सचेंज सुरू करुन परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी (व्हॉईस आॅव्हर इंटरनेट प्रॉटोकॉल) कॉल हे अनधिकृत सीम बॉक्सचा वापर करुन त्यात भारतीय कंपनीचे सिम कार्डस वापरुन भारतातील इच्छित मोबाईल क्रमांकावर केले जात असल्याची माहिती भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने केंद्रीय टेलिकम्युनिकेशन विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध पथके तयार करुन १७ मे रोजी पहाटे ४ वा. च्या सुमारास आरोपींच्या घरी तसेच त्यांच्या टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून त्यांना अटक केली. या कारवाईत १८ सिम बॉक्सेस आढळले. या बॉक्सेस मध्ये रिलायन्स आणि टाटा डोकोमो या कंपनीचे सुमारे ४२० सिमकार्डस मिळाले. सिमबॉक्स हे इंटरनेट कनेक्शनला राऊटरच्या मार्फतीने जोडले होते. तसेच या यंत्रामध्ये बसविलेल्या विविध सिमकार्डद्वारे परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल भारतीय मोबाईल क्रमांक तथा दूरध्वनी क्रमांकाशी जोडले जात होते. तसेच आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी वॉईस कॉल हे सेल्युलर नेटवर्कमध्ये डोमॅस्टीक (देशांतर्गत) कॉल म्हणून जोडले जात होते. त्यामुळे भारतातील मोबाईल क्रमांकाच्या डिस्प्लेवर परदेशातील मोबाईल क्रमांक न येता भारतातील मोबाईल कंपनीचे क्रमांक यायचे. हे फोन कोणत्याही सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागत नाहीत. या कॉल्सची नोंद टेलिकम्युनिकेशन विभागाकडेही (डिओटी) होत नसल्याने भारत सरकारचा आतापर्यंत ३० कोटींचा महसूलही बुडाल्याचे उघड झाले आहे.देशविघातक कारवायांसाठी वापर?- अशा अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे होणाऱ्या कॉलचा वापर देशविघातक आणि इतर अवैध बेकायदेशीर कामांसाठी केला जाण्याची शक्यताही सिंग यांनी वर्तविली.ही बाब देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर असून, याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, भारतीय टेलिग्राफ कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरूया संपूर्ण टेलिफोन एक्सचेंजची यंत्रणा राबविणाऱ्या टोळीचा म्होरक्या टाटा आणि रिलायन्सचा माजी कर्मचारी आहे. त्याचाही आता कसून शोध घेण्यात येत आहे.हवालासाठी उपयोग?अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांमधून या टेलिफोन केंद्रावर कॉल्स येत होते. अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची नसली तरी गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांसाठी तसेच हवालामार्फत येणाऱ्या पैशांसाठीही या कॉल सेंटरचा उपयोग केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदेशातून येणाऱ्या या कॉल्सचा कोण वापर करीत होते? यामागे आणखी कोणती टोळी कार्यरत आहे का? या सर्व बाबींचाही तपास करण्यात येत आहे.