शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चापाड्यात जीवघेणी कसरत

By admin | Updated: July 18, 2016 04:02 IST

तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस

हुसेन मेमन,

जव्हार- तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस आल्याने, विद्यार्थी व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या धोक्कादायक पुलावरूनच ये-जा करावी लागत आहे. मोर्चापाडा व दसकोड नदीवरील पुलाजवळ दोन्ही बाजूने पक्के व चांगले रस्ते आहेत. मात्र पुलाची दुरुस्ती नसल्याने, पूर्ण पूल गंजून मोडून गेला आहे. त्यामुळे या धोकादायक पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी, येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. जव्हार तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड या दोन गावांमध्ये ४ कि. मी. अंतर असून, मोर्चापाडा येथे पावसाळ्यात एसटी बस येत नसल्याने येथील शाळेत व कॉलेजला जाणारे विद्यार्थी व नागरिकांना बस गाठण्यासाठी दसकोड गावात जावे लागत आहे. मात्र मोर्चापाडा व दसकोड या गावाजवळील नदीवर ३५ ते ४० वर्षापूर्वी लोखंडी पुलाचे बांधाकाम करण्यात आले आहे. परंतु हा लोखंडी पूल जुनाट होऊन, गंजून गेल्याने, पूर्ण पूल जीर्ण होऊन मोडून गेला आहे. दसकोड पुलावरून यापूर्वी जीप, मोटारसायकल, ट्रक्स, याची वाहतूक सुरू होती. मात्र, या पुलाला अनेक वर्ष होऊनही दुरुस्ती नसल्याने, हा पूल धोकादायक बनला आहे. तरीही येथील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने, या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. मोर्चापाडा येथील विद्यार्थ्यांना नाइलाजाने रोज याच मोडकळीस पुलावरून विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला ये-जा करावे लागत आहे. दसकोड गावात येणारी एसटी बस गाठण्यासाठी याच मोडकळीस व धोकादायक पुलावरून पायी प्रवास करावा लागत आहे.मोर्चापाडा येथील नागरिकांना कामानिमित्त व विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी या मोडकळीस पुलावरून जायचं नसेल, तर ११ कि.मी. पायी प्रवास करून मेढा येथे एसटी बसवर जावे लागत आहे. मोर्चापाडा व दसकोड नदीवरील धोकादायक पूल गेल्या अनेक वर्षापासून दुरु स्तीला आला आहे. या पुलापर्यंत दोन्ही बाजूने चांगले रस्ते आहेत. मात्र नदीवरील पूलच नादुरुस्त व मोडकळीस असल्याने, विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले आहेत. तरीही जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून ये-जा करावी लागत आहे. येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. याचा मोठा फटका येथील नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे.