शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मोर्चापाड्यात जीवघेणी कसरत

By admin | Updated: July 18, 2016 04:02 IST

तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस

हुसेन मेमन,

जव्हार- तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस आल्याने, विद्यार्थी व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या धोक्कादायक पुलावरूनच ये-जा करावी लागत आहे. मोर्चापाडा व दसकोड नदीवरील पुलाजवळ दोन्ही बाजूने पक्के व चांगले रस्ते आहेत. मात्र पुलाची दुरुस्ती नसल्याने, पूर्ण पूल गंजून मोडून गेला आहे. त्यामुळे या धोकादायक पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी, येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. जव्हार तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड या दोन गावांमध्ये ४ कि. मी. अंतर असून, मोर्चापाडा येथे पावसाळ्यात एसटी बस येत नसल्याने येथील शाळेत व कॉलेजला जाणारे विद्यार्थी व नागरिकांना बस गाठण्यासाठी दसकोड गावात जावे लागत आहे. मात्र मोर्चापाडा व दसकोड या गावाजवळील नदीवर ३५ ते ४० वर्षापूर्वी लोखंडी पुलाचे बांधाकाम करण्यात आले आहे. परंतु हा लोखंडी पूल जुनाट होऊन, गंजून गेल्याने, पूर्ण पूल जीर्ण होऊन मोडून गेला आहे. दसकोड पुलावरून यापूर्वी जीप, मोटारसायकल, ट्रक्स, याची वाहतूक सुरू होती. मात्र, या पुलाला अनेक वर्ष होऊनही दुरुस्ती नसल्याने, हा पूल धोकादायक बनला आहे. तरीही येथील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने, या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. मोर्चापाडा येथील विद्यार्थ्यांना नाइलाजाने रोज याच मोडकळीस पुलावरून विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला ये-जा करावे लागत आहे. दसकोड गावात येणारी एसटी बस गाठण्यासाठी याच मोडकळीस व धोकादायक पुलावरून पायी प्रवास करावा लागत आहे.मोर्चापाडा येथील नागरिकांना कामानिमित्त व विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी या मोडकळीस पुलावरून जायचं नसेल, तर ११ कि.मी. पायी प्रवास करून मेढा येथे एसटी बसवर जावे लागत आहे. मोर्चापाडा व दसकोड नदीवरील धोकादायक पूल गेल्या अनेक वर्षापासून दुरु स्तीला आला आहे. या पुलापर्यंत दोन्ही बाजूने चांगले रस्ते आहेत. मात्र नदीवरील पूलच नादुरुस्त व मोडकळीस असल्याने, विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले आहेत. तरीही जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून ये-जा करावी लागत आहे. येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. याचा मोठा फटका येथील नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे.