शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

सुकलेल्या फळबागांचा करणार अंत्यविधी

By admin | Updated: May 30, 2016 02:29 IST

अधिका-यांना वाटल्या कार्यक्रमाच्या पत्रिका : वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांचा पवित्रा.

वाशिम: प्रशासकीय अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकर्‍यांना फळबाग व पीक विमासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुशिला देवढे यांनी २९ मे रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून अधिकार्‍यांना आमंत्रणसुद्धा दिले आहे. मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्‍वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे या शेतकर्‍यांनी त्यांच्या मालकीच्या दुबळवेल येथील शेतांमध्ये गत सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले. पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे झाडांचे संगोपन करणे कठीण बनलेल्या शेतकर्‍यांनी फळबाग पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांचे उंबरठे झिजविले असता, शासकीय नियमातील आडकाठीमुळे दुबळवेल गावाचा समावेश असलेले मंडळ विम्यासाठी पात्र ठरत नाही. फळबाग पीक विमा लागू होण्यासाठी सदरहू मंडळात किमान २0 हेक्टर शेतजमिनीवर फळबाग लागवड असणे शासकीय नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्यक्षात किन्हीराजा मंडळात ३९ हेक्टर एवढी फळबाग आहे, असे असतानाही आतापर्यंत सदर विभागाने फळबागेचे क्षेत्र कमी दाखविल्याचे गौडबंगाल काय, हा शेतकरी वर्गाला अचंबित करणारा प्रश्न ठरणार आहे. दरम्यान, २0१६ पासून आता यापुढे फळ पीक विमा लागू होईल, असे कृषी विभागाने संबंधित शेतकर्‍यांना कळविले आहे. शेतकरी फळ पीक विमा योजनेसाठी पात्र असताना त्यांच्याकडून विमा भरून घेतला असता तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. कृषी विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आणि म्हणून याच्या निषेधार्थ शेतजमिनीवरील फळझाडे उखडून काढून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी मालेगाव, मंडळ अधिकारी आदींच्या उपस्थितीत झाडे जाळून त्याचा प्रतीकात्मक अंत्यविधीचा कार्यक्रम दुबळवेल येथे ३१ मे रोजी आयोजित करून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वितरित केल्या आहेत.