शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

सुकलेल्या फळबागांचा करणार अंत्यविधी

By admin | Updated: May 30, 2016 02:29 IST

अधिका-यांना वाटल्या कार्यक्रमाच्या पत्रिका : वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांचा पवित्रा.

वाशिम: प्रशासकीय अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकर्‍यांना फळबाग व पीक विमासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुशिला देवढे यांनी २९ मे रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून अधिकार्‍यांना आमंत्रणसुद्धा दिले आहे. मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्‍वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे या शेतकर्‍यांनी त्यांच्या मालकीच्या दुबळवेल येथील शेतांमध्ये गत सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले. पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे झाडांचे संगोपन करणे कठीण बनलेल्या शेतकर्‍यांनी फळबाग पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांचे उंबरठे झिजविले असता, शासकीय नियमातील आडकाठीमुळे दुबळवेल गावाचा समावेश असलेले मंडळ विम्यासाठी पात्र ठरत नाही. फळबाग पीक विमा लागू होण्यासाठी सदरहू मंडळात किमान २0 हेक्टर शेतजमिनीवर फळबाग लागवड असणे शासकीय नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्यक्षात किन्हीराजा मंडळात ३९ हेक्टर एवढी फळबाग आहे, असे असतानाही आतापर्यंत सदर विभागाने फळबागेचे क्षेत्र कमी दाखविल्याचे गौडबंगाल काय, हा शेतकरी वर्गाला अचंबित करणारा प्रश्न ठरणार आहे. दरम्यान, २0१६ पासून आता यापुढे फळ पीक विमा लागू होईल, असे कृषी विभागाने संबंधित शेतकर्‍यांना कळविले आहे. शेतकरी फळ पीक विमा योजनेसाठी पात्र असताना त्यांच्याकडून विमा भरून घेतला असता तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. कृषी विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आणि म्हणून याच्या निषेधार्थ शेतजमिनीवरील फळझाडे उखडून काढून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी मालेगाव, मंडळ अधिकारी आदींच्या उपस्थितीत झाडे जाळून त्याचा प्रतीकात्मक अंत्यविधीचा कार्यक्रम दुबळवेल येथे ३१ मे रोजी आयोजित करून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वितरित केल्या आहेत.