शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे !

By admin | Updated: January 19, 2015 04:28 IST

केंद्राने प्रतिटन चारशे ते पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यायला हवे़ १० वर्षांपूर्वी नाबार्डने साखर कारखान्यांना पॅकेज दिले

शिर्डी : केंद्राने प्रतिटन चारशे ते पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यायला हवे़ १० वर्षांपूर्वी नाबार्डने साखर कारखान्यांना पॅकेज दिले होते़ त्याच धर्तीवर सरकारने पुढाकार घेऊन पॅकेज दिले तर साखर उद्योग तरेल, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटले. त्यात तीन वर्षांऐवजी पाच वर्षाने अबकारी कर भरण्याची सवलत देण्यात आली़ ही तात्पुरती मलमपट्टी आहे. शेवटी ते कर्जच असल्याने साखर कारखानदारीवरील संकट कायम राहणार आहे़ साखर निर्यातीच्या अनुदानाबाबतही संदिग्धता असल्याने निर्यातही होत नाही. एकीकडे साखर नियंत्रणमुक्त होत असताना एफआरपीचे बंधन घालण्यात येते़ शेतकऱ्यांसाठी शासनाने एफआरपी वाढवण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे़मात्र एफआरपी व साखरेच्या भावातील तफावत केंद्राने भरून काढली नाहीतर साखर कारखानदारीसमोर पुन्हा संकट उभे राहील, याकडे त्यांनी लक्ष वेधले़ नारपार व दमणगंगेबाबत झालेले करार मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)