शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

...तर सांगली-कोल्हापूर रस्ता केंद्राच्या निधीतून

By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST

नितीन गडकरी यांची ग्वाही : काँग्रेस नेत्यांची गरिबी हटली !

सांगली : सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. त्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने घ्यावा. राज्य शासनाला रस्त्याचे काम पूर्ण करणे जमत नसेल, तर केंद्राच्या निधीतून चौपदरीकरण पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगलीत दिली. पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत साऱ्यांनीच ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता; पण देशात कोठेच गरिबी हटली नाही. फक्त काँग्रेस नेते व त्यांच्या चेल्यांचीच गरिबी हटल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सांगलीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील होते. मेळाव्यात खासदार संजय पाटील यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की, सांगली-कोल्हापूर रस्ता चंद्रकांतदादांकडे आहे. त्यांनी काय तो निर्णय घ्यावा. राज्य शासनाकडून या रस्त्याचे काम पूर्ण होत नसेल, तर मी केंद्राकडून जेवढा लागेल तेवढा निधी रस्त्यासाठी मिळवून देतो. सांगली ते नागज, नागज ते मंगळवेढा, मंगळवेढा ते सोलापूर या २८०० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम मंजूर झाले असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. गेल्या पन्नास वर्षांत जेवढे रस्ते महाराष्ट्रात झाले नाहीत, तेवढे रस्ते पाच वर्षांत बांधून देणार आहोत. त्यासाठी सव्वालाख कोटीचा निधीही मंजूर केला आहे. देशावर साठ वर्षे राज्य करणारे आम्ही एका वर्षात काय केले, म्हणून विचारत आहेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी ते राहुल गांधींपर्यंत साऱ्यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता; पण काँग्रेस नेते व त्यांच्या चेल्यांचीच गरिबी हटली. जनता आजही गरिबीतच दिवस काढत आहे. काँग्रेसने देशाला भ्रष्टाचार, बेरोजगारी दिली आहे. भय, भूक व आतंक यापासून देश मुक्त झाला पाहिजे. बेरोजगारांना रोजगार, शेतीला पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोनिया गांधींना देशातील तरुणांच्या रोजगाराची चिंता नाही. त्यांना त्यांच्या मुलाला (राहुल गांधी) कसा रोजगार मिळेल, याची चिंता असल्याचा टोलाही गडकरी यांनी लगावला. सांगली, आटपाडीसारखी लहान शहरे, गावांत उद्योग उभारले पाहिजेत, ही केंद्राची भूमिका आहे. आम्ही अंबानी, अदानीसाठी एक इंचही जमीन संपादन करणार नाही.रेल्वे, वीज, रस्ते, सिंचनासाठी जमिनी घेऊ, असे जाहीर करूनही भूसंपादनाबाबत काँग्रेसकडून अपप्रचार सुरू आहे. महाराष्ट्रात सिंचनाचे क्षेत्र १६.८ टक्के आहे, तर कृषी विकासाचा दर मायनस आहे. हे पाप कुणाचे? केंद्रात कृषीमंत्री कोण होते? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)