शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

नियोजन समित्यांकडे निधी पडून

By admin | Updated: March 11, 2015 02:13 IST

राज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांकडे सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. ३१ मार्चपर्यंत तो खर्च करण्याचे आव्हान संबंधित

आविष्कार देसाई, अलिबागराज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांकडे सुमारे २ हजार ४०० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. ३१ मार्चपर्यंत तो खर्च करण्याचे आव्हान संबंधित जिल्हा नियोजन समितीला पेलावे लागणार आहे. निधी खर्च न झाल्यास तो सरकारच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी ९ मार्चपर्यंतची आहे. ३१ मार्चपर्यंत कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याने त्यामध्ये वाढ होऊ शकते. ३६ जिल्ह्यांसाठी सुमारे पाच हजार ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे चार हजार ७५५ कोटी रुपये त्या त्या जिल्ह्यातील नियोजन समितीकडे वितरीत करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे तीन हजार ४५४ कोटी रुपये ९ मार्चपर्यंत खर्च झाले आहेत. अद्यापही सुमारे दोन हजार ४९१ कोटी रुपयांचा निधी संबंधीत जिल्हा नियोजन समितीकडे पडून आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च न झाल्याने संबंधीत जिल्हा नियोजन समितीकडे विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी निधीची मागणीच केली नसल्याचे अधोरेखित होते. निधी परत जाऊ नये यासाठी निधीचा पूर्ण वापर करण्यासाठी संबंधीत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री यांची त्यासाठी परवानगी आणि सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे.