शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मार्गदर्शक तत्त्वांअभावी निधी पडून

By admin | Updated: September 26, 2015 02:58 IST

१४व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०१५-१६च्या

मिलिंदकुमार साळवे,श्रीरामपूर (जि. अहमदनगर)१४व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०१५-१६च्या जनरल बेसिक ग्रँटच्या पहिल्या हप्त्यापोटी ८११ कोटी ६६ लाखांचा निधी केंद्राने महाराष्ट्राला दिला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने तो जिल्हा परिषदांना वितरीतही केला; पण मार्गदर्शक तत्त्वांअभावी तो ग्रामपंचायतींपर्यंत पोचू शकलेला नाही. ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या निधीचे वाटप, निधीच्या वापराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, वितरीत निधीतून घ्यावयाची कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे विनियोगाची कार्यपद्धती स्पष्ट करणारा शासन निर्णय स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. तोपर्यंत या अनुदानातून कोणताही खर्च करू नये, असे १६ जुलै २०१५च्या आदेशानुसार सांगण्यात आले. ग्रामपंचायतींसाठीच असलेला हा निधी जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘बीम्स’ प्रणालीवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदांनी तो तत्काळ कोषागारातून काढून १४व्या केंद्रीय वित्त आयोगासाठी स्वतंत्रपणे उघडलेल्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. १६ जुलैला ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या जनरल बेसिक ग्रँटपोटी ८११ कोटी ६६ लाखांच्या पहिल्या हप्त्याचा आदेश जारी केला. पण त्यास अडीच महिने उलटले तरी ग्रामपंचायत स्तरावर निधीच्या वापराविषयीच्या मार्गदर्शक सूचनांचा शासन आदेश न निघाल्याने हा निधी पडून आहे.