शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआय मुंबईला हलविणार?

By admin | Updated: July 8, 2015 01:53 IST

एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना ही संस्था मुंबईला हलविण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना ही संस्था मुंबईला हलविण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन आणखी चिघळू शकते. नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नेमणूक करण्याविरोधात मागील २५ दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. मात्र त्यास शासनाकडून अजून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच एफटीआयआय मुंबईला स्थलांतरित करण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते.गीता कृष्णन समितीने एसआरएफटीआय आणि एफटीआयआय या दोन्ही संस्था मुंबईतील चित्रपट उद्योगाकडे हस्तांतरित करण्याची सूचना केली आहे. चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था देशात आहेत, तरीही सरकारने प्रशिक्षण संस्थेची जबाबदारी उचलण्याची काय गरज काय आहे? असाही मुद्दा समितीने उपस्थित केला आहे. चित्रपट प्रशिक्षण संस्थेला आंदोलनाचा इतिहास असून, आतापर्यंत ३९ वेळा आंदोलने झाली आहेत. एका विद्यार्थ्यावर वर्षाला साधारणपणे २० लाख रूपये खर्च होतो, अशी आकडेवारीही समितीने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयापुढे ठेवली आहे. एफटीआयआयला बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने यंदाच्या अंदाजपत्रकात ४० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. संस्थेला ‘नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स’चा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)संस्थेत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ६० अधिष्ठाते आहेत. आंदोलन मागे न घेतल्यास सरकारला ही संस्था मुंबईला हलविण्याबाबत विचार करावा लागेल, असे मंत्रालयाचे म्हणणे असल्याचे समजते.