शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण

By admin | Updated: January 20, 2016 01:29 IST

हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाने दलित विद्यार्थ्यांचे केलेले निलंबन आणि त्यापैकी रोहित वेमुला याने केलेली आत्महत्या या घटनांच्या निषेधार्थ एफटीआयआयच्या स्टुडंट

पुणे : हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाने दलित विद्यार्थ्यांचे केलेले निलंबन आणि त्यापैकी रोहित वेमुला याने केलेली आत्महत्या या घटनांच्या निषेधार्थ एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनच्या आठ विद्यार्थ्यांनी मंगळवारी एकदिवसीय उपोषण केले. या घटनांची स्वतंत्ररीत्या चौकशी व्हावी आणि विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी मुझफ्फरनगर दंगलीसंदर्भात भाष्य करणारा ‘मुझफ्फरनगर अभी बाकी है’ हा माहितीपट आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या वतीने दाखविण्यात आला होता. त्या वेळी अभाविप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या माहितीपटाचे सादरीकरण बंद पाडले होते. अभाविपचा स्थानिक कार्यकर्ता सुशीलकुमार याने फेसबुकवर आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांविरोधात बदनामीकारक मजकूर लिहिला होता. त्याचा आंबेडकर असोसिएशनने निषेध केला होता. त्यावर सुशीलकुमारने माफीही मागितली. मात्र, दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा खोटा आरोप सुशीलकुमारने केला. विद्यापीठाने चौकशी समितीमार्फत घटनेचा तपास केला. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याच्या अंगावर कोणत्याच जखमा आढळल्या नाहीत, असा अहवालही विद्यापीठाकडे सादर करण्यात आला. मात्र, भाजपचे आमदार रामचंद्र राव यांनी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. पी. शर्मा यांची भेट घेतली आणि केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय आणि केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाने रोहितसह चार जणांना विद्यापीठासह वसतिगृहातून निलंबित केले. या विद्यार्थ्यांना कॅन्टिनसह प्रशासनाच्या आवारात जायला मज्जाव करण्यात आला. एक प्रकारे त्यांना बहिष्कृत करण्यात आले. एफटीआयआयच्या आंदोलनाशी देखील हे विद्यार्थी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनने घेतला असल्याचे विद्यार्थी राकेश शर्मा याने सांगितले.